Category: मराठी न्यूज

Marathi News

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात उंदरांचा हैदोस:2 विद्यार्थ्याना रेबीजची लागण, वसतिगृहाचा निष्काळजीपणा; विद्यार्थी संघटना आक्रमक

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठात सध्या उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक 6 मध्ये 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे आढळून आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या साहित्याचे देखील या उंदरांनी नुकसान केले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचे दिसत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून तीन महिन्यांपूर्वी...

कोल्हापुरातील शाळेचा भोंगळ कारभार:बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर आले वेगळेच विषय, विद्यार्थ्यांसह पालकांचा संताप

बारावीची परीक्षा अगदी उद्यावर येऊन ठेपलेली असतानाच हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. या भोंगळ कारभारामुळे कोल्हापूर येथील विमला गोयंका शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. कोल्हापूर येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 120...

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक:विधानसभेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार – नाना पटोले

परभणीतील हिंसाचार प्रकरणी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी विधानसभा सभागृहात खोटी माहिती दिल्यामुळे काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सूर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला, अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले....

सुरेश धसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार:म्हणाले – संत असल्यासारखे वागू नका, तुम्ही एकदाही परभणीच्या भीमसैनिकांशी संपर्क केला नाही

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी सुरेश धस यांच्यासह सरकारवर हल्ला चढवला आहे. धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तूम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा…! फिट्टमफाट हिशोब होईल, अशी...

माझे लेकरू परत आणून देऊ शकता का?:सोमनाथच्या आईचा सुरेश धसांना सवाल, म्हणाल्या – आम्ही गुन्हेगारांना माफ करणार नाही

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह करू नये, असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केले होते. यानंतर विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. सुरेश धस यांच्या विधानावर सूर्यवंशी कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली. जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी...

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महीने पूर्ण:वेळीच सूत्र हलले असते तर आरोपी फरार झाले नसते, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महीने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वेळीच सूत्र हलले असते तर आरोपी फरार झाले नसते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री...

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा:15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी राज्यभरात 271 भरारी पथकांची नियुक्ती

महाराष्ट्रात आता उद्यापासून दिनांक 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. या परीक्षेला 37 तृतीयपंथी नागरिकांनी देखील नोंदणी...

मुंबईत ‘ताज’सारखे आणखी एक भव्य-दिव्य हॉटेल उभारणार:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; रतन टाटांच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबईमधील ताज हॉटेल म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयाचे त्याचबरोबर भारतातील नागरिकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. इतकेच नव्हे तर विदेशी पर्यटकांची देखील ताज हॉटेलच पहिली पसंती असते. स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचे हे हॉटेल असल्याने एक वेगळा जिव्हाळा या हॉटेलबद्दल प्रत्येकाला वाटतो. मुंबईची शान असलेल्या या हॉटेलसारखे आणखी एक हॉटेल मुंबईमध्ये नव्याने बांधले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या हॉटेलचा...

गुड न्यूज, वीजदर होणार स्वस्त:महावितरणकडून दिवसाच्या वापराला मिळणार अधिक सवलत; टीओडी मीटर मोफत बसवून देणार

महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला...

उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला:मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी घेतली भेट; चर्चेला उधाण

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देसाईसह आंबादास दानवे देखिल होते. आज सकाळीच फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंचे विश्वासू नार्वेकर फडणवीसांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या...

-