नागपूरमधील घटनेला काँग्रेसच जबाबदार:हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला, रावसाहेब दानवे यांचा दावा
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब...