Category: मराठी न्यूज

Marathi News

अरविंद केजरीवालांनंतर अण्णा हजारेंनी ठाकरेंनाही सुनावले:ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचे जग; संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा भाजपकडून दारुण पराभव झाला. यात माजी मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला होता. त्याला आता...

एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर:सुहास कांदे चांगलेच भडकले; स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला सज्जड दम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्यात आभार सभा आयोजित केल्या आहेत. त्यांची आगामी आभार सभा नाशिक मध्ये 14 तारखेला होणार आहे. मात्र, या सभेच्या निमित्ताने नाशिक मधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आमदार सुहास कांदे यांच्या समोरच चव्हाट्यावर आल्याने ते चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी नाशिक मधील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सज्जड दम...

मार्चपर्यंत राज्यात पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉलची घोषणा

‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत.त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री...

महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीवरुन सुप्रिया सुळेंचे दिल्लीत आंदोलन:संसदेतही मांडला मुद्दा; न्याय मिळेपर्यंत आवाज बुलंद करणार

जनहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या तासात आज लोकसभेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांचा मुद्दा उपस्थित केला. गेली काही महिन्यांपासून ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. पण 4 फेब्रुवारी पासून खरेदी बंद झाली आहे. एकट्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात सुमारे 40 हजार शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन नोंदणी केली. परंतु केवळ 20 हजार शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली...

बीड जिल्ह्यात पुन्हा गुंडांचा हल्ला:माजलगावातील स्मशानभूमी देखील सुरक्षित नाही? मोटारसायकल जाळली, स्वर्ग रथही फोडला

माजलगाव शहरातील पावर हाऊस रोडवर सिंदफना काठावर राजस्थानी समाजाची स्मशानभूमी असून रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ५ ते ७ गुंडानी याठिकाणी घुसून उभा असलेला स्वर्ग रथ फोडून टाकला. स्वर्ग रथाचे चालक सय्यद बाबु सय्यद उस्मान यांना मारहाण केली. शिवाय या ठिकाणी राहण्यास असलेले गंगाधर गायकवाड यांची मोटर सायकल पेटवून दिली. माजलगाव मध्ये पोलिस प्रशासन आहे की नाही? अशी परिस्थिती असून...

आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंचा होणार समावेश:आधी डावलल्यानंतर आता वाईल्ड कार्ड एन्ट्री, मंत्रिमंडळ बैठकीत नियमात करणार बदल

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. परंतु सरकारकडून हा निर्णय आता फिरवण्यात येणार आहे. राज्य सरकारने या निर्णयात बदल केला असून एकनाथ शिंदेंचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये 2005...

सर्वांनाच मुले असतील, त्यामुळे यात राजकारण नको:ऋषीराज सावंत अपहरण नाट्यावरुन मोठ्या भावाचे आवाहन; स्पष्टच सांगितले कारण

वडिलांच्या भीतीपोटी ऋषीराज सावंत याने बँकॉकच्या दौऱ्याविषयी सांगितले नाही, अशा शब्दात शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी अपहरण नाट्यासंदर्भातील सर्व हकिगत सांगितली. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे आता या प्रकरणावर...

अजितदादांना जवळ करत शिदेंना दूर लोटणार:देवेंद्र फडणवीसांची अशी रणनिती, अंजली दमानियांचे राजकीय विश्लेषण; चर्चांना उधाण

अजित पवार यांना जवळ करत एकनाथ शिंदे यांना दूर लोटण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. दमानियांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ते नाराज दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा...

ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करणारा तारा निखळला:रा. रं. बोराडेंच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने दर्जेदार साहित्यिक गमावला

मराठी ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यात आपले महत्वाचे योगदान देणारे कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मान्यवरांनी म्हटले आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा...

जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का?:आमदार सुरेश धस यांचा संताप; म्हणाले – ‘त्यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको’

परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचे काम मी करत होतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना केवळ रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे. मोर्चा शांत करण्याचा प्रयत्न मी करत होतो. मात्र जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील...

-