Category: मराठी न्यूज

Marathi News

विधान परिषदेतील चर्चेत महायुती सरकारला घोषणांवरून घेरले:90 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला दिले फक्त 61 कोटी- दानवे

मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणारा मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प ३० हजार कोटींवरून ९० हजार कोटींवर गेला आहे. मात्र, त्यासाठी काही महिन्यांपूर्वी फक्त ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. महायुती सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे, असा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.मंगळवारी २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी शेतकरी...

जलवाहिनीची दुरुस्ती लांबल्याने 50 हजारांवर कुटुंबे पाण्याविना:फुटलेल्या पाइपचे पाणी नव्या जलवाहिनीत शिरल्याने फटका

शहराला पाणीपुरवठा करणारी ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकळी फाटा येथे सोमवारी (१० मार्च) निखळली. यामुळे शहरात २२ दशलक्ष लिटर पाणी कमी येत आहे. परिणामी, शहरातील पाण्याचा टप्पा पुढे ढकलला आहे. जुन्या शहरातील बहुतांश भागांत गेल्या १० दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे जुन्या शहरासह सिडको, हडको, गारखेडा, उस्मानपुरा आदी भागांतील सुमारे ५० हजार कुटुंबांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतील...

इंडिगोच्या पुणे-रायपूर विमानाचे संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग:वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे 161 प्रवासी व 3 बालके सुरक्षित

इंडिगोच्या पुणे- रायपूर (छत्तीसगड) या विमानाने मंगळवारी (११ मार्च) रात्री पुण्याहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यावेळी विमान चिकलठाणा विमानतळाच्या एअर ट्रॅफिक सेंटरच्या कक्षेत होते. चिकलठाणा विमानतळावर विमान तातडीने उतरवण्यात आले. या विमानात १६१ प्रवासी व तीन बालके होते. मात्र, इंडिगोने मुंबईहून आलेल्या विमानातून रायपूरच्या प्रवाशांना पाठवले. त्यामुळे मुंबईला जाणारे प्रवासी खोळंबले होते. रात्री...

पहाटेच्या अजानचा भोंगा बंद:दिवसाही 55 डेसिबलची अट, कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत दिलेल्या आदेशाची राज्यात कटाक्षाने अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजवण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे कटाक्षाने बंद ठेवले पाहिजेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. या नियमाचे उल्लंघन...

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात मोठा बदल:पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई, महसूलमंत्र्यांचा निर्णय

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात मोठा बदल केला आहे. यानुसार जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, पण त्यासाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे....

योजनांना हिंदू देवतांचे नाव देणे चुकीचे:मल्हार सर्टिफिकेशनचे नाव बदलावे, श्री क्षेत्र जेजुरी संस्थानच्या विश्वस्तांचे नीतेश राणेंना पत्र

भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे. आता मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मात्र, या योजनेचे नाव त्वरीत बदलावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नीतेश राणे यांना केली आहे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे...

अबू आझमींना सत्र न्यायालयाचा दिलासा:20000 रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण, मोगल बादशहाचे गायले होते गुणगान

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे अडचणीत आले होते. मोगल बादशहा औरंगजेबाचे गुणगान गायल्यामुळे त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र आता या गुन्ह्यात अबू आझमींना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या बाँडवर त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच 12, 13 आणि 15 रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात...

अमरावती विद्यापीठात महिला सक्षमीकरण कार्यशाळा:स्त्रियांना कायद्याचे ज्ञान आवश्यक, पोलिस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांचे मत

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात एका महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भरोसा महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायद्याच्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. विद्या परिषद सदस्य डॉ. जयश्री धोटे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची विशेष उपस्थिती होती. दिप्ती...

सज्जन जगणार नाही, दुर्जन मरणार नाही:जयंत पाटलांचे विधानसभेत कविता वाचन, सरकारला टोले लगावत काढले चिमटे

अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आज अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कवितेच्या माध्यमातून सरकारला टोला लगावत चिमटे काढले. जयंत पाटील म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण या अर्थसंकल्पाचे वर्णन दुर्दैवाने मला बडा घर पोकळ वासा, असे करावे लागत...

हा तर देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प:फक्त घोषणा आणि थापा भोवती फिरतो, अंबादास दानवेंची बजेटवर घणाघाती टीका

राज्य सरकारने सोमवारी 2025 – 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेला अर्थसंकल्प हा देशोधडीला लावणारा व राज्याला अधोगतीला नेणारा असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. घोषणा आणि थापा या भोवती अर्थसंकल्प फिरत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. सरकारला पाहिजे तेच सरकार जुने नव्याने सांगत आहे लाडक्या भावाला नोकरी नाही लाडक्या बहिणीला रक्षण नाही ना शाळा आहे...

-