Category: मराठी न्यूज

Marathi News

सुरेश धसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार:म्हणाले – संत असल्यासारखे वागू नका, तुम्ही एकदाही परभणीच्या भीमसैनिकांशी संपर्क केला नाही

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी सुरेश धस यांच्यासह सरकारवर हल्ला चढवला आहे. धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तूम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा…! फिट्टमफाट हिशोब होईल, अशी...

माझे लेकरू परत आणून देऊ शकता का?:सोमनाथच्या आईचा सुरेश धसांना सवाल, म्हणाल्या – आम्ही गुन्हेगारांना माफ करणार नाही

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह करू नये, असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केले होते. यानंतर विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. सुरेश धस यांच्या विधानावर सूर्यवंशी कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली. जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी...

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महीने पूर्ण:वेळीच सूत्र हलले असते तर आरोपी फरार झाले नसते, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महीने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वेळीच सूत्र हलले असते तर आरोपी फरार झाले नसते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री...

उद्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा:15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपीमुक्तीसाठी राज्यभरात 271 भरारी पथकांची नियुक्ती

महाराष्ट्रात आता उद्यापासून दिनांक 11 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. या परीक्षेला 37 तृतीयपंथी नागरिकांनी देखील नोंदणी...

मुंबईत ‘ताज’सारखे आणखी एक भव्य-दिव्य हॉटेल उभारणार:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; रतन टाटांच्या आठवणींना दिला उजाळा

मुंबईमधील ताज हॉटेल म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयाचे त्याचबरोबर भारतातील नागरिकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. इतकेच नव्हे तर विदेशी पर्यटकांची देखील ताज हॉटेलच पहिली पसंती असते. स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचे हे हॉटेल असल्याने एक वेगळा जिव्हाळा या हॉटेलबद्दल प्रत्येकाला वाटतो. मुंबईची शान असलेल्या या हॉटेलसारखे आणखी एक हॉटेल मुंबईमध्ये नव्याने बांधले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या हॉटेलचा...

गुड न्यूज, वीजदर होणार स्वस्त:महावितरणकडून दिवसाच्या वापराला मिळणार अधिक सवलत; टीओडी मीटर मोफत बसवून देणार

महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला...

उद्धव ठाकरेंचे शिलेदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला:मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी घेतली भेट; चर्चेला उधाण

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देसाईसह आंबादास दानवे देखिल होते. आज सकाळीच फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंचे विश्वासू नार्वेकर फडणवीसांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या...

छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा:एकदा काय ते शुभमंगल करून टाका, राज ठाकरे-फडणवीस भेटीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मात्र, विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जात आहे. एकदा काय ते शुभमंगल करून...

मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड:ज्यावेळेस लोकांना माझी गरज नसेल तेव्हा मी घरच्या गादीवर बसेल, पंकजा मुंडे यांचा बीडमधून घणाघात

राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना...

रणवीर अलाहाबादियाची पालकांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी:विजय वडेट्टीवारांचा थेट पंतप्रधानांना सवाल, फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

कॉमेडियन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नेहमीच चर्चेत असतो. हा शो अनेक वेळा वादातही सापडला आहे. या शोच्या नवीन भागात यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहाबादिया सारखे स्टार्स दिसले आहेत. रणवीर अलाहाबादियाने शोमध्ये एका स्पर्धकाला पालकांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट पंतप्रधानांना सवाल केला आहे. तर राज्याचे गृहमंत्री...

-