बीड जिल्हा केंद्रशासित करा, तिथे हैवानांचा हैदोस:माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी, अनेक बळी जाण्याची व्यक्त केली भीती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडमधील गुन्हेगारी, दहशत तसेच कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची धक्कादायक मागणी केली. तसेच तिथे हैवानांचा हैदोस सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे...