
महाराष्ट्र अलर्ट मोडवर:पाकसोबत लढताना मुंबईचे जवान मुरली नाईक शहीद; मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात आढावा बैठक
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे आहे. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संबंधीत सर्व घटना घडामोडींचे अपडेट पहा...