News Image

पाक विरोधात लढताना मुंबईचा जवान धारातीर्थी:मुरली नाईक यांना पूंछमध्ये लढताना आले वीरमरण, अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उडवले. यात जवळपास 100 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, त्याला देखील भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या युद्धात मुंबईच्या जावानाला वीरमरण आले आहे. पाकिस्तानच्या या कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील दोन जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. LOC वर लढताना आले वीरमरण मुंबई येथील मुरली नाईक हे दिनांक 9 मे रोजी पहाटे एलओसी (LOC) येथे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत. मुंबई येथील घाटकोपर येथे त्यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करत शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. झोपडपट्टी पुनर्विकासात त्यांचे घर गेले दरम्यान, मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.