ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार:डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सह्याद्री अतिथीगृहात मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील...

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे:आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण...

ऑनर किलिंग रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल:प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार ‘सुरक्षागृह’, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे निर्देश

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर...

भाजपमध्ये सगळे दगाबाजी करून मंत्री झाले:अमित शहांनी जरा रिसर्च करावा, संजय राऊत यांचा पलटवार

शिर्डी येथे भाजपचे अधिवेशन पार पडले, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले. भाषणातून अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांनी दगाबाजीचे राजकारण केले असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. अमित शहा यांनी जरा रिसर्च करणे गरजेचे असल्याची टीका संजय राऊत यांनी...

बीड जिल्हा केंद्रशासित करा, तिथे हैवानांचा हैदोस:माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी, अनेक बळी जाण्याची व्यक्त केली भीती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. बीडमधील गुन्हेगारी, दहशत तसेच कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची धक्कादायक मागणी केली. तसेच तिथे हैवानांचा हैदोस सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे...

धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिसांची बैठक:खासदार बजरंग सोनवणे यांचा गंभीर आरोप, आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याची केली मागणी

मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याची बैठक झाली असल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या पूर्वी आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता. खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाली असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मस्साजोग...

दिल्ली विमानतळावर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मासोबत​​​​​​​ गैरवर्तन:म्हणाले– वेळेवर पोहोचूनही फ्लाइट चुकली, कर्मचाऱ्यांनी एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर फिरवले

टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यामुळे त्याचं विमानही चुकलं. अभिषेक सुट्टी साजरी करणार होता. 24 वर्षीय अभिषेकने सोमवारी, 13 जानेवारी रोजी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी लिहिले- ‘दिल्ली विमानतळावर मला इंडिगोचा सर्वात वाईट अनुभव आला. कर्मचाऱ्यांचे वर्तन विशेषतः काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तल यांना पूर्णपणे अस्वीकार्य होते. त्याची...

तालिबानविरोधात कारवाई करण्याचे मलाला यांचे आवाहन:मुस्लीम नेत्यांना सांगितले- अफगाण मुलींचे भविष्य हिरावून घेतले जाईल, तुमची ताकद वापरा

नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाई यांनी रविवारी पाकिस्तानमधील मुस्लीम मुलींच्या शिक्षणाबाबत आयोजित परिषदेत भाग घेतला. सीएनएनच्या वृत्तानुसार, यावेळी त्यांनी मुस्लीम नेत्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लैंगिक भेदभावाला गुन्हा ठरवण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी अफगाण महिलांच्या स्थितीबद्दल अफगाण तालिबानचा निषेध केला. तालिबानच्या धोरणांविरोधात मुस्लीम नेत्यांनी पुढे यावे, असे मलाला म्हणाल्या. त्यांनी मुलींना शाळा आणि विद्यापीठात जाण्यापासून रोखले आहे. तालिबानच्या दडपशाही कायद्यांना खुलेआम...

बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये:कोणावरही दयामाया दाखवू नका; मुख्यमंत्र्यांचा SP-CID अधिकाऱ्यांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. धनंजय देशमुख यांच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपींशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे. संतोष...

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी:कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गालगत ऍग्रो हब उभारण्यात यावेत असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गगा लगत उभारण्यात येणार...

-