बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसी‎पाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले‎:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3 दरवाजांद्वारे 30 हजार क्युसेक विसर्ग‎
बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसी‎पाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले‎:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3 दरवाजांद्वारे 30 हजार क्युसेक विसर्ग‎
सर्वोच्च न्यायालयाच्या ‎निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील ‎‎धर्माबाद तालुक्यातील बाभळी ‎‎बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध ‎‎जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) ‎‎सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,‎३ व ४ मधून सुमारे ३० हजार‎क्युसेक वेगाने ०.६ टीएमसी पाणी ‎‎तेलंगणाच्या दिशेने सोडण्यात आले. ‎‎पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्याची‎पातळी ३३०.८० मीटर असून ७.१८‎दलघमी साठा शिल्लक आहे.‎ बाभळी बंधारा पूर्ण होऊन १३ वर्षे‎पूर्ण झाली. या वर्षी बंधाऱ्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎क्षमतेइतका म्हणजेच २.७४ टीएमसी‎साठा आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्र‎तुडुंब भरले आहे. सर्वोच्च‎न्यायालयानुसार २९ ऑक्टोबर रोजी‎दरवाजे बंद करायचे आदेश होते,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎परंतु शेतकऱ्यांनी विरोध केल्याने‎गतवर्षी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी‎त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत‎दरवाजे बंद केले होते. त्यानंतर‎रविवारी निर्देशानुसार विसर्ग केला.‎