Natepute Express

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा
मुख्य बातमी 1/3

मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारने झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णय, प्रमाणपत्रे आणि प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी सरकार तसेच अधिकाऱ्यांना सुनावले.

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा
मुख्य बातमी 2/3

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत निराश होता.

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं
मुख्य बातमी 3/3

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते.

BUSINESS SPOTLIGHT Verified
S

Shree Enterprises

रिअल इस्टेट

★★★★★ (5.0)

आधुनिक इंटिरियर्ससाठी तुमचे विश्वासू PVC आणि WPC तज्ज्ञ!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारामहाराष्ट्र

मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारने झालेली चूक मान्य करून ती दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णय, प्रमाणपत्रे आणि प्रलंबित मागण्यांवरून त्यांनी सरकार तसेच अधिकाऱ्यांना सुनावले.

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावामहाराष्ट्र

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत निराश होता.

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलंमहाराष्ट्र

3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, "ज्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला, ती संस्था काँग्रेसचे अनेक वर्षे खासदार राहिलेले आणि स्थानिक नेते मारोतराव कोवासे यांची आहे. राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये अनुदान देते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी ही संस्थाचालकाची असते.

महाराष्ट्रात आजपासून दूध महागलंमहाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून दूध महागलं

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर आणखी एक भार पडला आहे. महाराष्ट्रात आज, 11 ऑगस्ट 2026 पासून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गायीचे दूध 60 रुपयांवरून 62 रुपये, तर म्हशीचे दूध 76 रुपयांवरून 78 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया उद्योगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुधाच्या दरवाढीचा परिणाम केवळ पिशवीतील दूध खरेदीवर होणार नसून दही, ताक, लोणी, पनीर, चीज, तूप, फ्लेवर्ड मिल्क आणि दुधापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. या दुग्धजन्य पदार्थांच्या दरात सुमारे 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्जमहाराष्ट्र

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की, रांचीतील या गंभीर घटनेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी का बंद आहे? तेथील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी हे आपले नाहीत का? या प्रकरणात मातोश्री आणि शिवतीर्थाचे दरवाजे बंद का आहेत? विरोधी पक्षांनी केवळ राजकीय सोयीची भूमिका घेण्याचे काम केले असून, ते कधीही विद्यार्थ्यांचे हित पाहत नाहीत.

फडणवीसांचे सर्व डाव संपलेमहाराष्ट्र

फडणवीसांचे सर्व डाव संपले

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा