Natepute Express
बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता
मुख्य बातमी 1/3

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला 1994 मध्ये प्रथम मान्यता, 1915 मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व 2011 मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे 41 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सिंचन योजनांच्या कामाची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकारांना दिली. ^कोणी काय केले आणि कोणी काय केले नाही, यापेक्षा तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले हे जेन झी व अल्फा या तरुण पिढीला तसेच जुन्या पिढीतील विसरलेल्या लोकांना समजावे, यासाठी हा लेखाजोखा सादर केला आहे. दिलीप सोपल, आमदार, बार्शी 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून उजनी बोगदा आणि बार्शी सिंचन योजनेला मंजुरी मिळाली . त्यानंतर 1995 ला महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. 2011 मध्ये वाढीव कामास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली.

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना
मुख्य बातमी 2/3

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना

मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णसेवा, औषधसाठा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जन आरोग्य समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धतीची माहिती दिली. समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी, औषध कक्ष, औषधसाठा, रुग्ण तपासणी कक्ष, लसीकरण विभाग, प्रसूती कक्ष, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, साधनसामग्री आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला
मुख्य बातमी 3/3

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याची पुरती वाट लागली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अवघ्या एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्ता उखडल्याने पावसाळ्यात वाहनधारकांसह पायी जाणारे शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या अतिलोढ गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (0.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
सोलापूर जिल्हा

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला 1994 मध्ये प्रथम मान्यता, 1915 मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व 2011 मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे 41 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सिंचन योजनांच्या कामाची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकारांना दिली. ^कोणी काय केले आणि कोणी काय केले नाही, यापेक्षा तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले हे जेन झी व अल्फा या तरुण पिढीला तसेच जुन्या पिढीतील विसरलेल्या लोकांना समजावे, यासाठी हा लेखाजोखा सादर केला आहे. दिलीप सोपल, आमदार, बार्शी 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून उजनी बोगदा आणि बार्शी सिंचन योजनेला मंजुरी मिळाली . त्यानंतर 1995 ला महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. 2011 मध्ये वाढीव कामास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली.

सोलापूर जिल्हा

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना

मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णसेवा, औषधसाठा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जन आरोग्य समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धतीची माहिती दिली. समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी, औषध कक्ष, औषधसाठा, रुग्ण तपासणी कक्ष, लसीकरण विभाग, प्रसूती कक्ष, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, साधनसामग्री आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

सोलापूर जिल्हा

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याची पुरती वाट लागली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अवघ्या एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्ता उखडल्याने पावसाळ्यात वाहनधारकांसह पायी जाणारे शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या अतिलोढ गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सोलापूर जिल्हा

सुप्रिया सुळेंकडे ओबीसी दाखल्याचे वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या वादादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत नवा राजकीय वाद पेटला. "राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतली असून सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी दाखला आहे," असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. "महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मलाच का टार्गेट करत आहे?" असा थेट सवाल करत त्यांनी यावर तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केले होते. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी जाहीर खेद व्यक्त केला आहे. एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.

महाराष्ट्र

अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. "अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले असून, ते त्यांचे काम अगदी उत्तम पद्धतीने करत आहेत," असा घणाघाती पलटवार अमित ठाकरे यांनी केला. नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात मनविसेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माझा मुलगा कोणत्या शाळेत जाणार, हे साटम ठरवणार का? अमराठी रिक्षाचालकांच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, "स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीची केल्याचे सांगितले, तरी हे लोक हिंदीत भाषण करतात. यावरूनच यांना मराठी भाषेची किती काळजी आहे हे दिसून येते.

महाराष्ट्र

टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास - सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 'औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद' असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे व्यवसाय-दुकाने बंद पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुस्लिम तरुणांसमोर नोकरी आणि रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती आणि अक्कलकोटच्या कार्यक्रमात टिपू सुलतानाचा फोटो स्टेजवर ठेवला होता. आता सर्व समाजाला एकत्र आणून राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे आपले काम आहे. साखर सम्राटांचे इथेनॉल धोरणावर मौन सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 पासून देशात महागाई प्रचंड वाढली आहे. ज्यांनी पूर्वी गॅस सिलेंडर हातात घेऊन आंदोलने केली, त्यांच्याच काळात आज सर्वसामान्यांना गॅस, साखर आणि अन्नधान्याचे भाव परवडेनासे झाले आहेत. 2014 नंतर कृषी उत्पादन घटल्याने

🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा