Natepute Express
🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

तुम्हीही पारंपरिक व्यवसायाला कंटाळला आहात का? तुमचे दुकान आता आणा ONLINE — फक्त 5 मिनिटांत! 📱 नातेपुते एक्सप्रेस वर मिळवा: तुमची स्वतःची हक्काची Business Website ग्राहकांकडून थेट WhatsApp Enquiry तुमच्या व्यवसायाची Online ओळख नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी 🎁 विशेष Launch Offer: 31-08-2026 पर्यंत रजिस्टर करा आणि मिळवा 45 दिवस FREE TRIAL! आजच तुमचा व्यवसाय Register करा!Register   

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा
मुख्य बातमी 1/3

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा

बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
मुख्य बातमी 2/3

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎
मुख्य बातमी 3/3

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून“अटलबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास चर्चा झाली. साडीचा झोका बांधल्यामुळे हा अपघात झाल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करत शिवराज म्हेत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रशासनाला जाब विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तो अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (0.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करासोलापूर जिल्हा

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा

बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणीसोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎सोलापूर जिल्हा

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून“अटलबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास चर्चा झाली. साडीचा झोका बांधल्यामुळे हा अपघात झाल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करत शिवराज म्हेत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रशासनाला जाब विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तो अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले.

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणारसोलापूर जिल्हा

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार

"येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत... शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं 'वर्षा' निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता 'वर्षा'वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळासोलापूर जिल्हा

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधलेली असते. गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, देहूकर कुटुंबीयांनी श्रीफळ हंडी फोडली.

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापनासोलापूर जिल्हा

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवेढा शहर व तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांनी केले आहे.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा