Natepute Express
🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

तुम्हीही पारंपरिक व्यवसायाला कंटाळला आहात का? तुमचे दुकान आता आणा ONLINE — फक्त 5 मिनिटांत! 📱 नातेपुते एक्सप्रेस वर मिळवा: तुमची स्वतःची हक्काची Business Website ग्राहकांकडून थेट WhatsApp Enquiry तुमच्या व्यवसायाची Online ओळख नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी 🎁 विशेष Launch Offer: 31-08-2026 पर्यंत रजिस्टर करा आणि मिळवा 45 दिवस FREE TRIAL! आजच तुमचा व्यवसाय Register करा!Register   

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही
मुख्य बातमी 1/3

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, "त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे
मुख्य बातमी 2/3

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे

मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन सदाकाळे,असमा शेख,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बियाणे जमीनीत गाढून घेते जमीन फाडून वर येते आणि सर्वांसाठी ऑक्सीजन निर्माण करते.या बिया सारखे प्रत्येकांनी घडले पाहिजे स्वतःला गाढून घेऊन इतरांसाठी जगण्यासाठी ऑक्सिजन देते.प्रतेकांच्या गरजा आज वाढल्या आहेत सर्व काही मिळालं आणि ऑक्सीजन जर मिळाले नाही तर काय होईल.

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद
मुख्य बातमी 3/3

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

शेतकरीबांधवांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारी टोळीला पकडण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड तसेच चोरीकरिता वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर संजीव मूसळे रा.चिद्रेवाडी, बालाजी गंगाराम नादरगे रा.डोंगरशेळकी या शेतकऱ्यांनी जनावरे चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (0.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाहीमहाराष्ट्र

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, "त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचेसोलापूर जिल्हा

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे

मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन सदाकाळे,असमा शेख,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बियाणे जमीनीत गाढून घेते जमीन फाडून वर येते आणि सर्वांसाठी ऑक्सीजन निर्माण करते.या बिया सारखे प्रत्येकांनी घडले पाहिजे स्वतःला गाढून घेऊन इतरांसाठी जगण्यासाठी ऑक्सिजन देते.प्रतेकांच्या गरजा आज वाढल्या आहेत सर्व काही मिळालं आणि ऑक्सीजन जर मिळाले नाही तर काय होईल.

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंदसोलापूर जिल्हा

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

शेतकरीबांधवांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारी टोळीला पकडण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड तसेच चोरीकरिता वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर संजीव मूसळे रा.चिद्रेवाडी, बालाजी गंगाराम नादरगे रा.डोंगरशेळकी या शेतकऱ्यांनी जनावरे चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगासोलापूर जिल्हा

निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी निलंगा शहरात महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज आणि वाहनांवर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता निलंगा तहसील कार्यालयाच्या परिसरातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तिरंगा ध्वज घेऊन दुचाकींवर सहभागी झाले होते. रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लांबोटा येथील वन परीक्षेत्र गाठले. यावेळी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महसूल विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करासोलापूर जिल्हा

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा

बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणीसोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा