Natepute Express
🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

🔥 नातेपुतेच्या व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥

तुम्हीही पारंपरिक व्यवसायाला कंटाळला आहात का? तुमचे दुकान आता आणा ONLINE — फक्त 5 मिनिटांत! 📱 नातेपुते एक्सप्रेस वर मिळवा: तुमची स्वतःची हक्काची Business Website ग्राहकांकडून थेट WhatsApp Enquiry तुमच्या व्यवसायाची Online ओळख नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी 🎁 विशेष Launch Offer: 31-08-2026 पर्यंत रजिस्टर करा आणि मिळवा 45 दिवस FREE TRIAL! आजच तुमचा व्यवसाय Register करा!Register   

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद
मुख्य बातमी 1/3

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी 12.31 वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री 12:30 वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी मंगळवेढा मध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येणार आहे, त्यानंतर सजलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. मूळ गावी गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभव यांनी दि.13 ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजता आई-वडील पत्नी यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या सगळे ठीक आहे ,तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणा केली, सगळे गावाकडे शांत झोपी गेले, शुक्रवारी 12:31 दुपारी अचानक जम्मू येथील मुख्यालयातून फोन आला आणि आई-वडिलांसह गावकऱ्यांचा काळजाचा ठेका चुकला. वैभव आवताडे शहीद झाल्याची बातमी आली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गणेशवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली.

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका
मुख्य बातमी 2/3

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका

आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने (FDA) 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'विमल पान मसाला' की 'विमल इलायची'? अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते 'विमल इलायची'च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष (Surrogate Advertising) जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार
मुख्य बातमी 3/3

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार

या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे, असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी आज (16 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि मराठा समाजाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. बावनकुळे आणि शिरसाटांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, "बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (0.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीदसोलापूर जिल्हा

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी 12.31 वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री 12:30 वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी मंगळवेढा मध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येणार आहे, त्यानंतर सजलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. मूळ गावी गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभव यांनी दि.13 ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजता आई-वडील पत्नी यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या सगळे ठीक आहे ,तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणा केली, सगळे गावाकडे शांत झोपी गेले, शुक्रवारी 12:31 दुपारी अचानक जम्मू येथील मुख्यालयातून फोन आला आणि आई-वडिलांसह गावकऱ्यांचा काळजाचा ठेका चुकला. वैभव आवताडे शहीद झाल्याची बातमी आली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गणेशवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली.

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणकामहाराष्ट्र

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका

आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने (FDA) 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'विमल पान मसाला' की 'विमल इलायची'? अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते 'विमल इलायची'च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष (Surrogate Advertising) जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गारमहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार

या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे, असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी आज (16 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि मराठा समाजाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. बावनकुळे आणि शिरसाटांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, "बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल.

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असतेमहाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, 'वंदे मातरम'चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून 'इडियट्स' गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. "हे तर इडियट कॅबिनेट, करा माझ्यावर तक्रार" सातारा येथील मंत्र्याबाबत (जयकुमार गोरे) बोलल्यामुळे आपल्याला नोटीस आल्याचे सांगत राऊत म्हणाले, "जर 'इडियट' हा शब्द असंसदीय असेल, तर सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी आणली पाहिजे. भाजपच्या लोकांना इडियट का म्हटले जाते, हे लोक रोज पाहतात. देशात आणि महाराष्ट्रात शोधून शोधून इडियट लोक एकत्र आणले आहेत आणि त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्री केले आहे.

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीकामहाराष्ट्र

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि सरकारच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांवरून सरकारला लक्ष्य केले. जात लिहिल्याने अर्धी लढाई जिंकली कशी? जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला.

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाहीमहाराष्ट्र

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, "त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा