मंगळवेढ्यात 59 वर्षांपासून सामाज प्रबोधनाचे नवरंग
संत नगरी मंगळवेढा शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित असणारे सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ होय. या मंडळाची स्थापना सन 1968 मध्ये झाली. मंडळाचे एकोणसाठावे वर्ष आहे, त्यावेळेचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै गौरीशंकर वठारे हे होते, सदर मंडळाचे समितीमध्ये स्वर्गीय बंडा मोडक, दामोदर दत्तू, चंद्रकांत किल्लेदार, निवृत्ती डोरले, सुकदेव जावळे, रामचंद्र चेळेकर, भाऊ चेळेकर, धोंडीराम राऊत, डॉ. बी. पी. देशमुख, बाबू लेंडवे, चंद्रकांत वेदपाठक पेंटर, लक्ष्मण चेळेकर, राजेंद्र भगरे हे होते व मंडळाचे मार्गदर्शक म्हणून आण्णाराव चेळेकर होते. यातील अनेक जण हयात नाहीत मात्र त्यांचे विचार व प्रेरणा घेऊन हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने स्थापनेपासून अंदाजे तीन ते चार वेळा रक्तदान शिबिर घेतले होते, यामध्ये जवळपास 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.