Natepute Express

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत
मुख्य बातमी 1/3

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा धंगेकर यांनी जाहीर निषेध नोंदवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वाचाळ नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही
मुख्य बातमी 2/3

कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालकांचा जेन-झी (Gen-Z) तरुणांशी संवाद आणि 'गुंगी गुडिया' या शब्दावरून झालेला वाद, या सर्व मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या 1500 मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले.

कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवर उदय सामंत यांचे मोठे विधान
मुख्य बातमी 3/3

कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवर उदय सामंत यांचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे दिली आहेत. मात्र, या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत (Validity) अनेक ठिकाणी अडचणी येत असून, ती नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना फुटीच्या सुनावणीवर आणि एमआयडीसी (MIDC) व उद्योजकांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.

BUSINESS SPOTLIGHT Verified
S

Shree Enterprises

रिअल इस्टेट

★★★★★ (5.0)

आधुनिक इंटिरियर्ससाठी तुमचे विश्वासू PVC आणि WPC तज्ज्ञ!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेतमहाराष्ट्र

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा धंगेकर यांनी जाहीर निषेध नोंदवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वाचाळ नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कायद्यापेक्षा कुणी मोठं नाहीमहाराष्ट्र

कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालकांचा जेन-झी (Gen-Z) तरुणांशी संवाद आणि 'गुंगी गुडिया' या शब्दावरून झालेला वाद, या सर्व मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या 1500 मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले.

कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवर उदय सामंत यांचे मोठे विधानमहाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवर उदय सामंत यांचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे दिली आहेत. मात्र, या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत (Validity) अनेक ठिकाणी अडचणी येत असून, ती नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना फुटीच्या सुनावणीवर आणि एमआयडीसी (MIDC) व उद्योजकांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची देशभरात 'तिरंगा रॅलीमहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची देशभरात 'तिरंगा रॅली

आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने संपूर्ण देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान भव्य 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष तिरंगा रॅली पार पडणार असून, यामध्ये राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत. या रॅलीत तब्बल 20 ते 25 हजार युवक-युवती सहभागी होणार असून, तरुणाईला पक्षाशी जोडण्यासाठी भाजपने हे मोठे नियोजन केले आहे. मुंबईत 10 ऑगस्टला भव्य सोहळा; 25 हजार तरुणांचा सहभाग स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे.

जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठकमहाराष्ट्र

जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक

जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुसऱ्या दिवशीही सुरू असणार आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर संघटनेची पुढील दिशा काय असावी, देशभरात संघटन कसे वाढवायचे, तसेच विविध राज्यांमध्ये जनआंदोलने उभारण्यासाठी कोणती रणनीती आखायची, यावर बैठकीत सविस्तर चर्चा होत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाहीमहाराष्ट्र

सीजेपीच्या बैठकीत दिपकेंच्या वडिलांनाही प्रवेश नाही

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. त्याऐवजी दबावगट म्हणून काम करणार, असे सीजेपीतर्फे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. न्यायव्यवस्था, मीडिया आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाल्याचे जंतर-मंतर, बंगाल, मुंबई आणि चेन्नईसह देशभरात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे संस्थांमधील नि:पक्षता आणि उत्तरदायित्व पुनरुज्जीवित करण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारणार, असेही सांगण्यात आले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या वाळूज येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री अडीच वाजेपर्यंत आणि बुधवारी सकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची राष्ट्रीय बैठक झाली.

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा