News Image

संघर्ष तीव्र:15 पाक जवान ठार, बीएलएचा 1/3 बलुचिस्तानवर कब्जा केल्याचा दावा, पाकच्या मोठ्या राज्यात वर्षातील 10 वा आत्मघाती हल्ला


बलूचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) लढवय्यांनी पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला केला आहे. बुधवारी झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे १५ जवान ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान लष्कराचा ताफा माच क्षेत्रातून जात होता, यादरम्यान हा हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य क्वेटा आणि डेरा बुगतीच्या खंदकांत लपले आहे. यंदाच्या वर्षातील हा दहावा आत्मघाती हल्ला आहे. बीएलएने दावा केला आहे की त्यांनी बलूचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवला आहे. बीएलएने बलूचिस्तानची राजधानी क्वेटा, कलात आणि मंगोचेर शहरांवर कब्जा मिळवल्याचा दावा केला आहे. गेल्या सहा महिन्यांत बलूच बंडखोरांचे कोहलू, डेरा बुगती आणि आसपासच्या भागांमध्ये वर्चस्व वाढले आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की आता संध्याकाळ होताच या भागांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गाड्या दिसत नाहीत. रात्री बीएलएचे लढवय्ये रस्त्यावर उतरतात आणि पाकिस्तानी जवान खंदकांमध्ये लपते. माजी पीएम म्हणाले... बलुचिस्तानवर लष्कर-सरकारची पकड झाली ढिली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी बलुचिस्तानवर आता लष्कर आणि सरकारचे नियंत्रण कमकुवत होत असल्याचे मान्य केले. त्यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा दावा फेटाळला,ज्यात त्यांनी फक्त १५०० बलूच बंडात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. अब्बासी म्हणाले, मी जे पाहिले, ते भयावह आहे. तेथील स्थिती एवढी वाईट आहे की, सरकारी मंत्री मोठ्या सुरक्षेशिवाय बाहेर पडू शकत नाही. सामान्य लोकांवर अत्याचार..गायब केलेल्या तरुणाचे टार्गेट किलिंग बलुचिस्तानात लष्कर व सरकारचा छळ सुरू आहे. केचच्या तुंप भागात २५ वर्षीय एहसान शौकतच्या पाकिस्तानच्या मिलिट्री इंटेलिजन्सद्वारे टार्गेटेड ऑपरेशनमध्ये हत्या केली. त्याला याआधीही बळजबरीने गायब केले होते. बलोच यकजहती कमिटीनुसार, सुटकेनंतर तो वडिलांसोबत मेडिकल क्लिनिक चालवत होता. कमिटीनुसार,अलीकडच्या आठवड्यांत मीराज बलोच, करीम बलोच आणि नबील बलोच अशा तरुणांची हत्या केली आहे.. विद्यार्थी, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांवर निशाणा बनवला जात आहे. कमिटीने लष्कर- सरकारला उत्तरदायी ठरवण्यासाठी यूएन व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनांकडे अपील केले आहे. या वर्षी बंडखोरांनी पाक लष्करावर २९ मोठे हल्ले केले, यात १८६ ठार