निष्ठावंतांना डावलून उद्धवसेनेत भाजपतून आयातांना उमेदवारी:संभाजीनगरात 5 पैकी 4 मतदारसंघात हीच रणनीती, स्थानिकांमध्ये नाराजी
‘गद्दार विरुद्ध खुद्दार’ आणि ‘पचासखोके सब ओके’ असा आक्रमकप्रचार करणाऱ्या उद्धवसेनेनेविधानसभा निवडणुकीत भाजपतूनआयात शिवसैनिकांना उमेदवारीदेण्याची रणनीती आखल्यानेनिष्ठावंतांमध्ये नाराजी आहे.उद्धवसेना संभाजीनगरातील ९ पैकी ६जागा लढवणार आहे. त्या पाचहीजागांवर निष्ठावंतांना डावलूनभाजपतील आयातांना उमेदवारीदिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळेकठीण काळातही सामान्य कार्यकर्तेकुठे कमी पडले नाही. संकटाच्याकाळातही पक्षाशी एकनिष्ठराहणाऱ्यांना अशीच फळे मिळणार का, असा प्रश्न मूळ शिवसैनिक विचारत आहेत. पश्चिम विधानसभा : मतदारसंघातबन्सीधर गांगवे ३० वर्षांपासून, तर चेतनकांबळे हे २४ वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्तेआहेत. त्यांचा दावा असताना भाजपतूनआलेले राजू शिंदे यांच्या नावाची शक्यताआहे. वैजापूर : शिंदेसेनेत गेलेल्या रमेश बोरनारेंनापाडण्यासाठी उद्धवसेना माजी नगराध्यक्ष दिनेशसिंहपरदेशींना रिंगणात उतरवणार आहे. तेथेही उद्धवसेनेचेनिष्ठावंत अविनाश गलांडे, संजय निकम, प्रकाश चव्हाणयांच्या कार्यकर्त्यांमधून अन्यायी भावना व्यक्त होत आहे. यापुढे पक्षाचे काम कसे करावे? रात्रंदिवस पक्षासाठी काम केले. माझ्यासारखे अनेकनिष्ठावंत आहेत. त्यांना उमेदवारी हवी होती. शिंदे गटाच्याबंडाळीमुळे आमच्या कामाचे चीज होईल, असेआम्हाला वाटत होते. पण आता उमेदवारी मिळण्याचीशक्यता धुसर झाली आहे. -चेतन कांबळे, प्रदेश संघटक, शिवसेना सिल्लोड : येथील सत्तारगडाला हादरा देण्यासाठीभाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश बनकर यांच्या उमेदवारीचीकेवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. तेथे निष्ठावंतविठ्ठल बदर यांच्यासह अनेकांमध्ये अस्वस्थता आहे.उमेदवारीसाठी इच्छुकांनाही मोठी आशा आहे. मध्य : येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना संधी देण्याची चर्चा सुरूआहे. तेदेखील काही काळ भाजपच्या मांडवाखालून जाऊन आले आहेत. असे असतानाबाळासाहेब थोरात, नंदकुमार घोडेले या उद्धवसेनेसोबत राहिलेल्यांमध्ये डावलण्यातआल्याची भावना आहे. थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते अंबादासदानवे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पैठण : खासदार पुत्र विलास भुमरेयांच्याविरोधात दत्ता गोर्डे, मनोज पेरे यांनी संघटनात्मक कामे केली, मात्र तेथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचेनिकटवर्तीय सचिन घायाळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. निवडून येणे हाच निकष राज्यातील परिस्थितीत उद्धव साहेबांच्या उमेदवारांचा स्ट्राईक रेटवाढवणे हा एकमेव निकष यामागे आहे. सिल्लोड भाजपचामतदार संघ असल्याने तुल्यबळ उमेदवार आमच्याकडे नव्हता.राजू शिंदेंचे नाव सर्व्हेमधून पुढे आले. वैजापूरचे सर्व शिवसैनिकपरदेशींच्या मागे आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना नाकारून आयातांवर मर्जीदाखवण्याचा प्रकार नाही. – किशनचंद तनवानी, जिल्हाप्रमुख, उबाठा