Natepute Express

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

Natepute Express

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

फडणवीसांचे सर्व डाव संपले
मुख्य बातमी 1/3

फडणवीसांचे सर्व डाव संपले

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी
मुख्य बातमी 2/3

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी राजधानी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय भेट होणार असून, संसदेत सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील तीव्र अडचणी आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली
मुख्य बातमी 3/3

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शांततेचे व एकजुटीचे आवाहन केले आहे. "घरामध्ये जसे मतभेद होतात, तसेच पक्षातही होतात; पण सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते," असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.

BUSINESS SPOTLIGHT Verified
S

Shree Enterprises

रिअल इस्टेट

★★★★★ (5.0)

आधुनिक इंटिरियर्ससाठी तुमचे विश्वासू PVC आणि WPC तज्ज्ञ!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →
📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
फडणवीसांचे सर्व डाव संपलेमहाराष्ट्र

फडणवीसांचे सर्व डाव संपले

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल," असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळीमहाराष्ट्र

शरद पवार गटाची मोठी राजकीय खेळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी राजधानी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय भेट होणार असून, संसदेत सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसमोरील तीव्र अडचणी आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ओढ आणि पाण्याचा गंभीर तुटवडा यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडलीमहाराष्ट्र

अजितदादांवर प्रेम होते म्हणूनच पवार साहेबांची साथ सोडली

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शांततेचे व एकजुटीचे आवाहन केले आहे. "घरामध्ये जसे मतभेद होतात, तसेच पक्षातही होतात; पण सर्वांना सोबत घेऊनच पुढे जावे लागते," असा मोलाचा सल्ला त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.

पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहीलमहाराष्ट्र

पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या (NUCFDC) नवनिर्मित कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी अर्बन बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर दिला. ते म्हणाले, "आम्ही अर्बन बँकिंग क्षेत्राला अधिक विकसित करत असून बँकिंग सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक होणार आहेत. या 'अम्ब्रेला' संस्थेमुळे अर्बन बँकिंगचा मोठा विस्तार होईल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा म्हणून काम करेल." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी सांगितले पंतप्रधानांशी भेटीचे नेमके कारणमहाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी सांगितले पंतप्रधानांशी भेटीचे नेमके कारण

"आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुळे यांनी केंद्र सरकारचे फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (FCRA) बिल, नीट परीक्षा वाद, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी आणि 'जेन झी' आंदोलनावर सरकारला धारेवर धरले.

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्जमहाराष्ट्र

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज

श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणातील रहिवासी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज आहे. यंदा सुमारे 5,220 जादा बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत."

नवीन जाहिराती

सर्व पहा →
🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा