मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट:राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा, मुंबईत आयआयसीटी उभारणार- फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की, आयआयटी जशी आहे तशी आयआयसीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली आयआयसीटी मुंबईत तयार होणार आहे. गोरगाव फिल्मसिटी येथील जागा निश्चित केली आहे. नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. 400 कोटीचा खर्च करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आयआयटी जशी आहे तशी आयआयसीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली आयआयसीटी मुंबईत तयार होणार आहे. आपल्या गोरगाव फिल्मसिटी येथील जागा निश्चित केली आहे. केंद्र सरकार त्यावर 400 कोटी खर्च करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नोलॉजीतल्या सर्व गोष्टी या आयआयसीटीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील. मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.