मुख्यमंत्री पुत्राला पाठिंबा देणारे कलानी तुतारी घेण्याची शक्यता:जयंत पाटील, सुळेंची भेट; उल्हासनगरमधून इच्छुक

लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी आमदार पप्पू कलानी हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पप्पू कलानी यांच्यासह त्यांची सून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. पप्पू कलानी यांच्यासह त्यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळे आता या संदर्भातली चर्चा चांगलीच रंगली आहे. पप्पू कलानी यांच्या सून पंचम कलानी या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठीच ओमी कलानी आणि पप्पू कलानी यांच्या सून पंचम कलानी यांनी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत पप्पू कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे कल्याण आणि डोंबिवलीतील उमेदवार मुख्यमंत्री पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत ते तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंब यांचे मोठे नाव आहे. वास्तविक महाविकास आघाडी कडून या मतदारसंघासाठी कलानी कुटुंबीयांचे एकमेव नाव आता चर्चेत आले आहे. कलानी यांच्या नावाला उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पदाधिकारी यांनी देखील मुक संमती दिल्याची चर्चा आता समोर आली आहे. त्यामुळे आता या संदर्भात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवारांच्या शिलेदाराला नाना पटोले यांनी डिवचले:सत्तेची मौजमस्ती आणि देशाची संपत्ती विकून श्रीमंत होण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला. पाच वर्ष सत्तेची मौजमस्ती करणे आणि देशाची संपत्ती विकणे आणि तिथूनच श्रीमंत होणे, असे काम या लोकांनी केल्याचे पटाले यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मत घेऊन त्यांना मोठी स्वप्न दाखवली होती. मात्र ती कधीच पूर्ण करण्याचे काम केले नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा…. रतन टाटांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली:गेल्या वर्षी पहिला पुरस्कार स्विकारणाऱ्या टाटांच्या नावानेच या पुढे उद्योगरत्न पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला आता रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योगरत्न रतन टाटा पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव असेल. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, रिअल इस्टेट, पर्यटन, वित्तीय सेवा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी, बँकिंग या क्षेत्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. त्यानंतर पहिलाच पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारालाच त्यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पूर्ण बातमी वाचा… रतन टाटा यांचे निधन:राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणार देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले होते. पूर्ण बातमी वाचा… रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी:शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; शिफारस करण्याची मागणी देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या 86 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आणि जगातील अनेक व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-