काँग्रेसच्या पुढाकाराने आघाडीतील वादावर तोडगा?:रमेश चेन्नथला मातोश्रीवर; आज पुन्हा चर्चोला सुरुवात होणार असल्याचे संकेत

महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत असलेला पेच सुटण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे मधल्या काळात रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मात्र आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडीची प्रकृती देखील चांगली असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या वादामुळे नाना पटोले चर्चेसाठी असतील तर आम्ही चर्चेला जाणार नाही, अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे गटाने घेतली होती. या दोन्ही पक्षांमध्ये असलेला वाद अखेर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर पुन्हा महाविकास आघाडीतील जागा वाटपास संदर्भातील चर्चा सुरू होणार आहे. अशी माहिती चेन्नीथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विदर्भातील जागांवरुन झाला होता वाद नाना पटाले हे विदर्भातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त जागा या काँग्रेसने लढवाव्यात अशी मागणी ते करत आहेत. त्याचाच विदर्भामध्ये ठाकरे गटाला देखील विस्तार करायचा असल्याने शिवसेना जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता उद्धव यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते. मुख्यमंत्री पदाच्या दावेसाठी हवे जास्त आमदार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होईल? याबाबत तिन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असा फार्मूला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे गट दोघांनाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासाठीच दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपात रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. ओवैसी यांना शह देण्यासाठी अखिलेश यादव यांची रणनीती?:ओवैसींच्या बालेकिल्ल्यातून फुंकले निवडणुकीचे रणशिंग समाजवादी पक्षाने महाराष्ट्र निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली; यामध्ये मानखुर्द शिवाजीनगर येथील अबू असीम आझमी, भिवंडी पूर्व येथील रईस शेख, भिवंडी पश्चिम येथील रियाझ आझमी आणि मालेगाव येथील सासने हिंद यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शुक्रवारी आरोप केला की, भाजप वक्फ (दुरुस्ती) विधेयकाद्वारे मुस्लिमांची मालमत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाचा छळ करण्याच्या उद्देशानेच हे विधेयक तयार करण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा…. महाराष्ट्राची कन्या गांधी घराण्याची सून होणार का?:काँग्रेस नेत्याच्या दाव्यामुळे चर्चेला जोर; अखेर वडिलांनी दिले स्पष्टीकरण काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. प्रणिती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. आता या अफवांवर सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्यात चुकीच्या चर्चा होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. पूर्ण बातमी वाचा… काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा:सरकारची अनुमती याचिका फेटाळली; नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणे हे बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ही अनुमती याचिका फेटाळत रश्मी बर्वे यांना दिलासा दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-