संजय राऊतांनी सकाळचा शिमगा बंद करावा:उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे अन् विकासासाठी सूचना द्याव्या- चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावे तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा सिमगा वर्षभरासाठी बंद करावा आणि महाराष्ट्रातील सरकारला विकासासाठी सूचना द्याव्यात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालण्यासाठी होळीच्या निमित्ताने नाना पटोलेंनी संकल्प करावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा. ठाकरेंना खोचक सल्ला चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्यांनी दररोज सभागृहात यावं. सभागृहात येऊन राज्य सरकारला चांगल्या गोष्टी सांगाव्या. कारण उद्धव ठाकरे हे फक्त कधीतरीच सभागृहात येतात असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे. राऊतांनी विकासासाठी सूचना द्याव्यात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहेत की ते दररोज सकाळी 9 वाजता जे खोचक टोले लगावतात. त्यांचा तो दररोजचा शिमगा त्यांनी वर्षभरासाठी बंद करावा आणि महाराष्ट्रातील सरकारला विकासासाठी सूचना द्याव्यात. दररोज सकाळी बोलावे पण राज्य कशाप्रकारे पुढे जाईल यासाठी बोलावे. काँग्रेस मजबूतीसाठी वडेट्टीवारांनी काम करावे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील चांगले प्रश्न मांडले पाहिजेत. आम्ही जो काही संकल्पनामा दिला, तो संकल्पनामा पुढे नेण्यासाठी आम्हाला विजय वडेट्टीवारांनी आम्हाला सातत्याने आठवण करून दिली पाहिजे. तसेच त्यांचा काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे. तसेच काँग्रेसमध्ये जे काही मनभेद आणि मदभेत आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न देखील वडेट्टीवारांनी केला पाहिजे, याच त्यांना शुभेच्छा. तर नाना पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिलेला आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आणि पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त सरकार चालण्यासाठी होळीच्या निमित्ताने नाना पटोलेंनी संकल्प करावा.