Category: मराठी न्यूज

Marathi News

राहुल गांधींनी केला मुंबईच्या धारावीचा दौरा:झोपडपट्टीत जाऊन शिवणकाम, कारागिरांच्या कौशल्याचे केले कौतुक

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज मुंबईतील धारावी झोपडपट्टीत भेट दिली. राहुल गांधी यांनी यावेळी धारावी येथील चामर स्टुडिओला भेट दिली, जिथे त्यांनी डिझायनर सुधीर राजभर आणि त्यांच्या कारागिरांच्या टीमला भेट दिली. चामार स्टुडिओ पुनर्नवीनीकरण केलेल्या टायर्सचा वापर करून हस्तकला पिशव्या बनवण्याच्या सर्जनशील दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे. हा स्टुडिओ ज्या दलित, चामड्याच्या कारागीर समुदायाच्या नावावरून त्याचे...

माझे पती गुजराथी पण ते अस्खलित मराठी बोलतात:महाराष्ट्राची भाषा मराठीच, भैय्याजी जोशी यांच्या विधानावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त विधानावर टीका केली जात आहे. मुंबईत मराठी शिकायची गरज नाही तसेच घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे विधान त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी...

सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर:अवैध रेती वाहतुकीत कोतवालापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत ‘देणे-घेणे’, जयंत पाटलांनी वाचून दाखवले पत्र

“वाळूचे कण रगडिता तेलही गळे…” या समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रयत्नवादाचे महत्त्व विशद करणाऱ्या ओळींचा अर्थच बदलवण्याचा चंग जिल्हातील रेती तस्करांनी बांधला असून यांच्यापुढे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे सांगत मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेले रेती, मॅगनीज व गौण खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी, असे पत्र या क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदार यांना पाठवले...

मारहाण करणाऱ्या तिघांना 3 वर्ष कारावास:हिंगोली न्यायालयाचा निकाल, मारहाणीत तिघांना केले होते जखमी

हिंगोली तालुक्यातील पारडा येथे क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण करून जखमी करणाऱ्या तिघांना तीन वर्ष साधी कैद व एकूण ३० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायधिश पी. आर. पमणानी यांनी गुरुवारी ता. ६ दिला आहे. याबबात विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. अनिल इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील संजय लगड यांच्या घराच्या पाठीमागील झाड गजानन घनघाव...

वडिलांना औरंगजेबाची उपमा दिल्याने लेक संतापला:अनिकेत तटकरेंनी महेंद्र थोरवेंना दिले प्रत्युत्तर, व्हिडिओ दाखवत गद्दारीचा आरोपही केला

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबाशी तुलना केली होती. यावर आता सुनील तटकरे यांचा मुलगा आक्रमक झाला असल्याचे समोर आले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी गद्दारी केली म्हणत थेट व्हिडिओच दाखवले आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो,...

आक्रमक भाषणांनी रान पेटवणारी:राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकनिष्ठ, सक्षणा सलगर यांच्यावर पक्षाकडून राष्ट्रीय पातळीची जबाबदारी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांची पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सोनिया दुहान या पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर होत्या. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. सोनिया दुहान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पद रिक्त होते. राष्ट्रवादी...

कोरटकर प्रकरणात विरोधकांचे राजकारण:कोर्टाच्या आदेशाविरोधात पोलिसांकडून अटकेसाठी अपील; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. या संदर्भात कोल्हापूर मधील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात विरोधक केवळ राजकारण करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्यांना राजकारण करायचे, त्यांना ते करू द्या, असे देखील त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते प्रसार माध्यमांशी संवाद...

भैय्याजी जोशी ऋषितुल्य, ते जे बोलले ते योग्यच:टीका करणाऱ्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमात झाले? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मुंबईत मराठी शिकलीच पाहिजे असे काही नाही. तसेच घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांना ऋषितुल्य भैय्याजी...

भूमिपुत्रासाठी गाव एकवटले:संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी बंद, 30 वर्षांपूर्वी सोडले होते गाव

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ बीड जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात आला होता. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे मूळ गाव बार्शी येथे देखील आज सकल मराठा समाजाच्यावतीने कडकडीत बंद पुकारण्यात...

RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न:चौफेर टीकेनंतर म्हणाले – माझ्या विधानामुळे गैरसमज झाला, मुंबईची भाषा मराठीच, ती सर्वांनी शिकावी

मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी, मुंबईही महाराष्ट्राचाच भाग आहे. मुंबईची भाषा मराठीच, याबद्दल दुमत नाही. मुंबईत बहूभाषिक लोक, सर्वांनी मराठी शिकले पाहिजे, असे म्हणत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. तसेच भाषेसाठी कधीही संघर्ष झालेला नाही, असेही भैय्याजी जोशी म्हणाले आहेत. काय म्हणाले होते भैय्याजी जोशी? मुंबई येथील...

-