Category: मराठी न्यूज

Marathi News

आक्रमक भाषणांनी रान पेटवणारी:राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकनिष्ठ, सक्षणा सलगर यांच्यावर पक्षाकडून राष्ट्रीय पातळीची जबाबदारी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांची पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सोनिया दुहान या पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर होत्या. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर सोनिया दुहान यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. सोनिया दुहान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पद रिक्त होते. राष्ट्रवादी...

कोरटकर प्रकरणात विरोधकांचे राजकारण:कोर्टाच्या आदेशाविरोधात पोलिसांकडून अटकेसाठी अपील; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. या संदर्भात कोल्हापूर मधील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात विरोधक केवळ राजकारण करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्यांना राजकारण करायचे, त्यांना ते करू द्या, असे देखील त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते प्रसार माध्यमांशी संवाद...

भैय्याजी जोशी ऋषितुल्य, ते जे बोलले ते योग्यच:टीका करणाऱ्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमात झाले? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मुंबईत मराठी शिकलीच पाहिजे असे काही नाही. तसेच घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांना ऋषितुल्य भैय्याजी...

भूमिपुत्रासाठी गाव एकवटले:संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी बंद, 30 वर्षांपूर्वी सोडले होते गाव

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ बीड जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात आला होता. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे मूळ गाव बार्शी येथे देखील आज सकल मराठा समाजाच्यावतीने कडकडीत बंद पुकारण्यात...

RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न:चौफेर टीकेनंतर म्हणाले – माझ्या विधानामुळे गैरसमज झाला, मुंबईची भाषा मराठीच, ती सर्वांनी शिकावी

मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी, मुंबईही महाराष्ट्राचाच भाग आहे. मुंबईची भाषा मराठीच, याबद्दल दुमत नाही. मुंबईत बहूभाषिक लोक, सर्वांनी मराठी शिकले पाहिजे, असे म्हणत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. तसेच भाषेसाठी कधीही संघर्ष झालेला नाही, असेही भैय्याजी जोशी म्हणाले आहेत. काय म्हणाले होते भैय्याजी जोशी? मुंबई येथील...

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी गुजराती लादण्याचा डाव:भैय्याजी जोशींचा उद्दामपणा खपवून घेणार नाही; जाहीर माफी मागा- अतुल लोंढे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे...

भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी:अनिल परब आक्रमक; म्हणाले- ‘शिवाजी महाराजांचा आणि मराठीचा अपमान सहन करणार नाही’

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे असे आवश्यक नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केले होते. यावर विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब चांगलेच आक्रमक झाले आहेत. भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच मराठी भाषेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा...

बीडमध्ये आकाशातून पडलेल्या दगडांचे गूढ उलगडले?:आशनीपाताचा प्रकार असल्याचे खगोल शास्त्रज्ञांचे मत, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकही दहशतीखाली होतेच त्यात आता आकाशातून दगड पडल्याची घटना समोर आल्याने दहशतीत आणखी भर पडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील लिमगावात आकाशातून एका शेतकाऱ्याच्या घरावर अचानक अचानक दगड पडले. हे दगड एवढ्या जोरात पडले की त्यातला एक दगड घराच्या पत्राला छिद्र पाडून घरात येऊन पडला. हा आशनीपाताचा प्रकार असावा,...

धनंजय मुंडेंना 30-40 वेळा फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे:मनोज जरांगे यांचा दावा; ‘किचड’ म्हणत लक्ष्मण हाकेंवर केली बोचरी टीका

संतोष देशमुख यांच्या हत्येची भयावह फोटो समोर आल्याचे ताजे असतानाचा जालन्यातील अन्वा येथे एका तरुणाला तप्त सळईने चटके दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणातील आरोपी मनोज जरांगेंचा उजवा हात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता. याबाबत मनोज जरांगेंना पत्रकारांनी विचारले असता, किचडाचे प्रश्न विचारू नका, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंवर केली. तसेच 30 ते 40...

भैय्याजी जोशींना आपण मराठी आहोत याचे भान नाही का?:राज ठाकरे यांचे खडेबोल; म्हणाले – मराठी माणूस हे विसरणार नाही हे लक्षात ठेवा

मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे भान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. इतकेच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी एका...

-