Category: मराठी न्यूज

Marathi News

प्रेमाने मागा सगळे देऊन टाकू:सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची चर्चा; ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे’ म्हणत पदाची महत्त्वकांक्षा नसल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. यातील शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत तर अजित पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. या दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केले...

शरद पवार यांच्यावर अमित शहांकडून प्रश्नांची सरबत्ती:केवळ मार्केटिंग करून नेता होणे पुरेसे नाही तर जमिनीवर काम करण्याचे आव्हान

सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? असे प्रश्न भाजपचे नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकारीता मंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. केवळ मार्केटिंग करुन नेता होणे पुरेसे नाही तर त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते, असा टोला देखील अमित शहा यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी यांनी सहकारिता मंत्रालयाची निर्मिती केली, इथेनॉल योजना आणली, अशा अनेक...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयासाठी प्रयत्न करा- अजित पवार:तर ‘अजितपर्व’त भविष्याचा वेध घेण्याचे तटकरेंचे आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी नांदेड जिल्हयातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी...

महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचे का?:सरकारने दावोसमधून आणलेल्या गुंतवणूकीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी; नाना पटोलेंची मागणी​​​​​​​

दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन...

छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवले:मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; युवराज संभाजीराजेंचीही नाराजी

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शन झाला आहे. आता या ट्रेलरवरून वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छावा संघटना तसेच मराठा...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महायुतीमध्ये मतभेद?:तिजोरीवरील ताण पाहता अजित पवारांचा विरोध; तर जाहीरनाम्यातील आश्वासन खोटे होते का? म्हणत राऊतांची टीका

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणावर महायुतीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली नव्हती. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण पाहता अर्थमंत्री असलेले अजित पवार यांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच...

अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत:शरद पवार यांचा थेट हल्ला; म्हणाले – देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणे अपेक्षित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शहा यांचे बोलणे अतिशय अतिटोकाचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ते कोल्हापूरला शिकले आहेत. मात्र त्यांचे बोलणे ऐकून हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांच्यावरील संस्काराचा उल्लेख पवार यांनी केला आहे....

महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल:संजय राऊत यांचा मोठा दावा; 600 कोटींच्या भूखंडावरुन बावनकुळेंवर टीका

आमच्यातील सर्व गाळ गेलेला आहे. मात्र जे राहिले आहेत ते राहणारच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांनी पक्षाशी बेइमानी केली ते गेलेले आहेत. त्यामुळे आता आमचे कोणीही जाणार नाही. अनेक संकटे पचवून ते आमच्यासोबत राहिलेले आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर आहेत. मात्र, शिंदे यांचा विचार वेगळा असू शकतो. त्यांनी ‘पैसा फेको, तमाशा देखो’...

अपघातास जबाबदार कोण?:अफवाखोरांना शोधायचे कसे हे मोठे आव्हान; जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मात्र प्रवाशांचीच चूक – ठाकरे गट

रेल्वेच्या तांत्रिक व मानवी चुकांमुळे गेल्या दोन-चार वर्षांत असंख्य रेल्वे दुर्घटना घडल्या व त्यात अनेकांचे बळी गेले; हे खरे असले तरी जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत मात्र प्रवाशांचीच चूक आहे, असे दिसते. रेल्वेमध्ये कुठलीही आग दिसत नसताना केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून धावत्या रेल्वेतून प्रवाशांनी उड्या माराव्यात याला काय म्हणावे? खऱ्याखुऱ्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखून उडी मारणे वेगळे, पण खोट्या माहितीवर विश्वास ठेवून...

दिव्य मराठी अपडेट्स:ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे निधन; पुण्यात वैंकुठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे निधन पुणे – मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (ता. २३) रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 101 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकारनगरात शुक्रवारी सकाळी त्यांच्या...

-