लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था पद्धती महत्वाची:राजकीय अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचे प्रतिपादन
स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीच्या शाळा आहेत.त्यामधून प्रशिक्षण होते. सर्व यशस्वी नेत्यांची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थातून झालेली आहे. भारताला ही संस्था नवी नाही, गावाच्या पातळीवर पंचायती कार्यरत होत्या. जगात स्थानिक स्वराज्य संस्थांचा किमान अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था पद्धती महत्वाची, असे मत राजकीय अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केले. भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने...