Category: मराठी न्यूज

Marathi News

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा:ग्रामपंचायतींमध्ये होणार महत्त्वाचे ठराव, राज्य महिला आयोगाचा पुढाकार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचयातींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष ग्राम सभेतून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचा ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या विशेष सभेची मागणी केली होती. महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा...

ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण आहे म्हणून काहीही बोलू नये:’तुमच्या औलादी कुठे शिकल्या’ म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मनसेकडून प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषेवर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर टीका केली होती. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानचे समर्थन करत राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. यावर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन म्हणाले, ॲट्रॉसिटी...

उद्धव ठाकरे अबू आझमींचा उघडपणे निषेध करू शकत नाही:आझमी हे महाविकास आघाडीचाच भाग, संजय निरुपम यांची टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अबू असीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही, असे संजय निरुपम म्हणाले आहेत. संजय निरुपम म्हणाले, सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी...

महाराष्ट्रातील लाखो नागरिक होणार वीज बिलमुक्त:शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली असून, यातून लाखो वीज ग्राहकांना वीज बिलमुक्ती मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन वीज धोरणांतर्गत स्मार्ट...

जयंत पाटील दादांचे आणि माझेही ऐकत नाही, हाच प्रॉब्लेम:देवेंद्र फडणवीसांकडून सभागृहातच टोला; सदस्यांमध्ये पिकला ‘हशा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना 2003 मधील आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा दाखला देत टोला लगावला. यावर जयंत पाटील यांनी देखील तेव्हापासून ‘तुमची इच्छा’ असल्याची आठवण करून दिली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील जयंतराव तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी...

परतूरच्या तहसीलदारांवर मुरूम माफियांचा हल्ला:रात्री उशिरा गस्तावर असताना घडला प्रकार, हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद

जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे या देखील पथकासोबत होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक 07/03/2025...

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाची निविदा काढली:नाशिक जळगाव या जिल्ह्यांना होणार फायदा, 49 हजार 761 क्षेत्र सिंचित होणार

नाशिक व जळगाव या जिल्ह्यांना सिंचनाचा फायदा करून देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पास शासनाने मान्यता दिली होती. आता त्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 7 हजार 15 कोटी 29 लाख रुपये खर्च आला आहे. नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 9.19 टीएमसी...

पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजीरोवर डल्ला:राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील त्यांच्या भाषणात केला. सरकार मोठं मोठया घोषणा करत मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करायची असल्यास लोकप्रिय योजनांच्या मागे...

संभाजीनगरात मुलीची छेड काढण्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला मारहाण:वाळूजमधील जोगेश्वरी भागातील घटना; VIDEO समोर

मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना वाळूज भागातील जोगेश्वरी येथे समोर आली. टोळक्याने बुधवारी सकाळी 14 वर्षांच्या मुलीची छेड काढली. मुलगी शाळेतून परत आल्यावर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आई, वडील, मुलगी व तिच्या बहिणी यांना टोळक्याने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रतीक सतीश राजपूत,...

मी तुलना केली नाही, माफी मागणार नाही:अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळले; हे सत्ताधारी पक्षाचे षडयंत्र ​​​​​​​असल्याचा दावा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहेत. दैवतासोबत कोणीही स्वतःची तुलना करत नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याला आता परब...

-