Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎
सोलापूर जिल्हा

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

LATEST STORIES

नवीन बातम्या

49 निकाल
आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎
सोलापूर जिल्हा

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ 180.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा 66.9 टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 270.1 मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत 281.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री 96.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तणच अधिक वाढले असून, त्याचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचे चित्र आहे. पेरणीनंतर पाऊस न झाल्याने जळून गेलेल्या पिकांची स्वतंत्र नोंद मात्र अद्याप झालेली नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पिकांसाठी अपेक्षित 3 लाख 37,968 हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 26,871 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण पेरणीचे क्षेत्र 3 लाख 44,194 हेक्टरवर पोहोचले आहे.

Natepute Pratinidhi
वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही
सोलापूर जिल्हा

वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही

येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली श्री संतनाथ महाराज यांची यात्रा दि. 23 ते 28 ऑगस्टपर्यंत आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बुधवारी रात्री सात वाजता संपन्न झाली. यामध्ये यात्रेमधील नियोजनाविषयी चर्चा झाली. मात्र नर्तकींच्या ताफ्यांना परवानगी नाकारल्याने अनेकांचा हिरमूड झाला. यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिस ठाणे येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीमध्ये श्री संतनाथ महाराज देवस्थान समितीचे प्रमुख ,तसेच भंडारा कमिटी, यात्रेतील प्रमुख प्रतापराव निंबाळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पालखी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करणे , महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करणे ,यात्रा काळात स्वच्छ पाणीपुरवठा, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पथक नेमणे, दहिहंडी वेळेवर फुटावी यासाठी लेझीम संघ प्रमुखानी दक्षता घेणे, आदि विषयावर निर्णय घेण्यात आला.

Natepute Pratinidhi
करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा
सोलापूर जिल्हा

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा तालुका व शहरात मुलींसाठी अनेक खासगी शैक्षणिक क्लासेस सुरू आहेत. मध्यंतरी काही क्लासेसमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडले असून, काही ठिकाणी शिक्षकांकडूनच विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलींच्या सुरक्षेसाठी करमाळा तालुक्यातील सर्व खासगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्याचे आदेश संबंधित चालकांना देण्यात यावेत.

Natepute Pratinidhi
निमगावात महिलांनी धरला फुगडीचा फेर
सोलापूर जिल्हा

निमगावात महिलांनी धरला फुगडीचा फेर

माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गौराईचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांच्या पारंपरिक गाण्यांसह झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळांनी उत्सवाला रंगत आली. तर पुरुषांनी वावड्या व लेझीमच्या खेळातून उत्साहाचे दर्शन घडवले. गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूकीने गौराईचे विसर्जन करण्यात आले. निमगाव येथे गौराई उत्सवाची परंपरा जपली जात असून गावातील महिलांबरोबरच सासरी गेलेल्या माहेरवाशिणी मुलीही या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. गावातील बारा बलुतेदारांना चिखलाची गौराई बनविण्यापासून ते उत्सवाच्या सांगतेपर्यंतचा मान आहे. त्यानुसार गौराईच्या पटांगणात उभारलेल्या मंडपात मानकऱ्यांनी सकाळपासून चिखलाची गौराई साकारली. सायंकाळी पटांगणात महिला व मुली मोठ्या संख्येने जमल्या. पारंपरिक गाणी म्हणत झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळ खेळण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता गौराईची मिरवणूक सुरू झाली. गौराईला स्पर्श करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. गावालगतच्या ओढ्यात रात्री उशिरा गौराई व वावड्यांचे विसर्जन करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

Natepute Pratinidhi
गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद
सोलापूर जिल्हा

गणेशवाडीचा वीर जवान वैभव आवताडे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाले आहेत. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. शुक्रवारी दुपारी 12.31 वाजता वैभव शहीद झाले असून रविवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे शव विमानाने पुणे येथे शनिवारी रात्री 12:30 वाजता येणार असून, पहाटे तीन वाजता पुणे येथून संरक्षण दलाच्या वाहनातून निघणार आहे, रविवारी मंगळवेढा मध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास येणार आहे, त्यानंतर सजलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. मूळ गावी गणेशवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभव यांनी दि.13 ऑगस्ट रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजता आई-वडील पत्नी यांच्याशी फोनवरून गप्पा मारल्या सगळे ठीक आहे ,तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणा केली, सगळे गावाकडे शांत झोपी गेले, शुक्रवारी 12:31 दुपारी अचानक जम्मू येथील मुख्यालयातून फोन आला आणि आई-वडिलांसह गावकऱ्यांचा काळजाचा ठेका चुकला. वैभव आवताडे शहीद झाल्याची बातमी आली आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गणेशवाडी गावासह तालुक्यावर शोककळा पसरली.

Natepute Pratinidhi
पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे
सोलापूर जिल्हा

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे

मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन सदाकाळे,असमा शेख,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बियाणे जमीनीत गाढून घेते जमीन फाडून वर येते आणि सर्वांसाठी ऑक्सीजन निर्माण करते.या बिया सारखे प्रत्येकांनी घडले पाहिजे स्वतःला गाढून घेऊन इतरांसाठी जगण्यासाठी ऑक्सिजन देते.प्रतेकांच्या गरजा आज वाढल्या आहेत सर्व काही मिळालं आणि ऑक्सीजन जर मिळाले नाही तर काय होईल.

Natepute Pratinidhi
वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद
सोलापूर जिल्हा

वाढवणा परिसरात जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

शेतकरीबांधवांनी कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची जनावरे चोरणारी टोळीला पकडण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड तसेच चोरीकरिता वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर संजीव मूसळे रा.चिद्रेवाडी, बालाजी गंगाराम नादरगे रा.डोंगरशेळकी या शेतकऱ्यांनी जनावरे चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर वाढवणा हद्दीत सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस उपाधिक्षक अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनात वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

Natepute Pratinidhi
निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा
सोलापूर जिल्हा

निलंग्यात निघालेल्या बाईक रॅलीत डौलाने फडकला तिरंगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी निलंगा शहरात महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी दि. 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा ध्वज आणि वाहनांवर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता निलंगा तहसील कार्यालयाच्या परिसरातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तिरंगा ध्वज घेऊन दुचाकींवर सहभागी झाले होते. रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लांबोटा येथील वन परीक्षेत्र गाठले. यावेळी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महसूल विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले

Natepute Pratinidhi
कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा
सोलापूर जिल्हा

कळंबवाडी-पानगाव, आणि पिंपळगाव रस्ता दुरुस्त करा

बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (पा.) ते पानगाव तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ॲड. विकास जाधव यांनी 15 ऑगस्टपासून बार्शी तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले की, कळंबवाडी (पा.) ते पानगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच कळंबवाडी (पा.) ते ढाळे पिंपळगाव या रस्त्याचे कामही अपूर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी केवळ खडी अंथरून रस्ता सोडण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असतानाही काम पूर्ण झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Natepute Pratinidhi
श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

Natepute Pratinidhi
बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎
सोलापूर जिल्हा

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून“अटलबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास चर्चा झाली. साडीचा झोका बांधल्यामुळे हा अपघात झाल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करत शिवराज म्हेत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रशासनाला जाब विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तो अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले.

Natepute Pratinidhi
पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार
सोलापूर जिल्हा

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार

"येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत... शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं 'वर्षा' निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता 'वर्षा'वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा