Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎
महाराष्ट्र

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

LATEST STORIES

नवीन बातम्या

72 निकाल
अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎
महाराष्ट्र

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर, उपविजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली. रिलमेकिंग स्पर्धेत वैशाली वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी, मेंदी, पाककला, सौंदर्य प्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रिलमेकिंग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील व रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अकलूजसारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नाग पंचमीचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठ स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केला. तो पुढे डॉ. धवलसिंह यांनी सुरू ठेवला आहे.

Natepute Pratinidhi
जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस
महाराष्ट्र

जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस

सांगोला आपली उपजीविका ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा मेंढरांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने सांगोला शहरातील गावडे वस्ती येथे मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घरापुढे मंडप उभारला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वाढदिवसाचा बॅनरही लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा फोटो प्रसिद्ध केला. अन् एवढ्या व्यापातून आमदार डॉ. देशमुख यांनी हजेरी लावून मेंढरांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापला. घरातील सदस्याच्या वाढदिवसाप्रमाणे हा सोहळा रंगला होता. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्याची मागील सहा वर्षांपासून परंपरा आहे. येथील सिद्धेश्वर गावडे यांच्या पुढाकारातून त्यांच्या घराजवळ हा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या वेळी गावडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावडे कुटुंबीयांकडे सध्या सुमारे 90 मेंढरं असून, त्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही मेंढरांसाठी खास तीन मजली केक तयार करून आणला होता. आमदार देशमुख, नातेवाईक, मित्रमंडळी असे 300 हून अधिक नागरि

Natepute Pratinidhi
बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎
महाराष्ट्र

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (70, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (65, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह 32 जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. तर बसच्या पुढील भाग चक्काचूर झाला. पिंपळगाव आगाराची नाशिक -पाचोरा बस (एम.एच. 40 वाय 5822) चाळीसगावच्या दिशेने जात होती. यावेळी समोरुन मालेगावच्या दिशेने जाणारा आयशर (एम. एच. 19 सीवाय 8525) व बसची समोरासमोर धडक झाली. परिसरातील नागरिक व अन्य वाहन चालकांनी मदत करत बसमधील जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे घटनास्थळी अपघातातील मृत रखूबाई पिरन माळी ह्या नाशिक येथे मुलाकडे राहत होत्या. मुळगावी एरंडोल येथे रेशनिंगच्या कामासाठी येत असताना ही घटना घडली. तर इर्शादबी मणियार यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय होता. मालेगाव येथून येतांना हा अपघात झाला.

Natepute Pratinidhi
वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या
महाराष्ट्र

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मतिमंद व भोळसर आहे. तिचे कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना, गावातील तरुणांनी संधी साधून तिला दुचाकीवर बसवले आणि शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर मुलीचे वर्तन विचित्र वाटल्याने आधी तिला रुग्णालयात नेण्यात आले. घरी आल्यावर तिच्या कपड्यांवर चिखल साचल्याचे पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता, तिघा नराधमांनी 50 रुपये व बिस्किटाचे आमिष दाखवून शेतात नेल्याचे तिने सांगितले. इतकेच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी गावातीलच एका तरुणाने अशाच प्रकारे तिच्यावर जबरदस्ती केल्याची आपुलकीची कबुलीही मुलीने दिली.

Natepute Pratinidhi
जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र
महाराष्ट्र

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींमध्ये 91 मंडळं आहेत. त्या मंडळांतील 91 पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पाऊस मोजला जातो. त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. प्रत्यक्ष पडलेला पाऊस आणि दप्तरी नोंदी यात पर्जन्यमापकांची संख्या कमी असल्याने विसंगती येत असल्याने अडचण होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील इतर दहा तालुक्यांपेक्षा मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, मारापूर ,मंगळवेढा या मंडळामध्ये केवळ दोन मोठे पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय कामकाजात केली आहे. शासनाच्या वतीने तालुक्यातील 7 महसुली मंडळात प्रत्येक ठिकाणी एक पर्जन्यमापक बसवले आहे. यावरच 81 गावांच्या पावसाची नोंद होते. त्यावरून त्या मंडळातील पावसाचे प्रमाण ठरवले जाते.

Natepute Pratinidhi
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका
महाराष्ट्र

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला मोठा दणका

आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची 'सरोगेट' (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र एफडीएने (FDA) 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'विमल पान मसाला' की 'विमल इलायची'? अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते 'विमल इलायची'च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष (Surrogate Advertising) जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.

Natepute Pratinidhi
मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टसाठी एल्गार

या सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी लागते. त्यासाठी मराठा समाजाने एकजूट असणे खूप महत्त्वाचे आहे, असा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी आज (16 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि मराठा समाजाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. बावनकुळे आणि शिरसाटांचा जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे पाटील म्हणाले, "बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल.

Natepute Pratinidhi
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचे प्राण वाचले असते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, 'वंदे मातरम'चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून 'इडियट्स' गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. "हे तर इडियट कॅबिनेट, करा माझ्यावर तक्रार" सातारा येथील मंत्र्याबाबत (जयकुमार गोरे) बोलल्यामुळे आपल्याला नोटीस आल्याचे सांगत राऊत म्हणाले, "जर 'इडियट' हा शब्द असंसदीय असेल, तर सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी आणली पाहिजे. भाजपच्या लोकांना इडियट का म्हटले जाते, हे लोक रोज पाहतात. देशात आणि महाराष्ट्रात शोधून शोधून इडियट लोक एकत्र आणले आहेत आणि त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्री केले आहे.

Natepute Pratinidhi
सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्र

सरकार ओबीसीविरोधी भूमिका घेतंय:विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “ओबीसीला संपवण्याचा विळा सरकारने उचलला आहे. सरकारची भूमिका ओबीसीविरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसींच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि सरकारच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकांवरून सरकारला लक्ष्य केले. जात लिहिल्याने अर्धी लढाई जिंकली कशी? जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात बोलताना वडेट्टीवार यांनी काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला.

Natepute Pratinidhi
मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही
महाराष्ट्र

मी कोणत्याही प्रस्थापिताच्या सुपारीवर राजकारण करत नाही

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. "मी एका सामान्य शेतकऱ्याचा आणि रेशन दुकानदाराचा मुलगा असून, कोणत्याही प्रस्थापितांच्या मेहरबानीवर किंवा कुणाच्या सुपारीवर मी राजकारण करत नाही. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो आहे," असा जोरदार पलटवार आमदार गोरे यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, "त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता.

Natepute Pratinidhi
डीपी-ईपीचा एकत्रित नकाशाच नाही; आरक्षण कुठे गेले
महाराष्ट्र

डीपी-ईपीचा एकत्रित नकाशाच नाही; आरक्षण कुठे गेले

शहर विकास आराखड्याचा (डीपी) अंतिम नकाशा नेमका कोणता, हा प्रश्न आता हजारो नागरिकांसमोर उभा राहिला आहे. 2 वर्षांच्या अभ्यासानंतर तयार झालेल्या विकास आराखड्यात शासनाने ‘ईपी’ (एक्सक्लुडेड प्लॅन) मंजूर करत तब्बल 408 प्रमुख बदल केले. मात्र, हे बदल मूळ ‘डीपी’मध्ये समाविष्ट करून समजेल असा एकत्रित अंतिम नकाशा अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे एखाद्या भागातील रस्ता, शाळा, रुग्णालय किंवा उद्यानाचे आरक्षण कायम आहे की बदलले, हे समजण्यासाठी नागरिकांना 2 वेगवेगळे नकाशे पडताळावे लागत आहेत. शासनाने विकास आराखड्याला मंजुरी देताना काही भाग वगळून ‘ईपी’ स्वतंत्र मंजूर केला. त्यात रस्त्यांची अलाइनमेंट, रस्त्यांची रुंदी, काही सार्वजनिक आरक्षणे आणि अन्य नियोजनात्मक बदल केले. या बदलांचे गॅझेट प्रसिद्ध झाले आणि आता नकाशेही उपलब्ध झाले आहेत. मात्र नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रश्न वेगळाच आहे.

Natepute Pratinidhi
7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक
महाराष्ट्र

7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक

व्यवसाय विस्तारासाठी 15 दिवसांत 7 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्सूल येथील प्रिंटिंग प्रेस उद्योजक प्रकाश रोहिणीकर यांना 1 कोटी 9 लाख 85 हजार 100 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी 11 ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्थानिक मध्यस्थ असलेल्या धर्मेंद्र झा (42) यास अटक करण्यात आली असून मोहिनी झा (35, रा. जयभवानीनगर), गणेश देशमुख (42), अमृता देशमुख ऊर्फ चिंचोळे (38, रा. जवाहर कॉलनी) तर दिल्लीतील सूत्रधार हरजितसिंग रुपराह (48), आरव अग्रवाल (40), अशोक सिंघल (35), दीपक आरोरा (30, चौघे रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या महिनाभरात कर्जाच्या नावाखाली फसवणुकीचा हा चौथा प्रकार आहे.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा