Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे आपले त्रिविध ताप निघून जातात
सोलापूर जिल्हा

श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे आपले त्रिविध ताप निघून जातात

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे आपले त्रिविध ताप निघून जातात
सोलापूर जिल्हा

श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे आपले त्रिविध ताप निघून जातात

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पांगरी (ता. बार्शी) येथील सदाशिवबुवा मठ, बाजारपेठ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी (दि. 5) काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये भाविक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी भोजन पंगत, सायंकाळी हरिपाठ, पोथी वाचन तसेच रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना पांगरीसह पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. महिला, पुरुष, युवक तसेच बालकांनी दिंडीत सहभागी होत भक्तिमय वातावरण निर्माण केले. यानंतर मोरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.

Natepute Pratinidhi
उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎
महाराष्ट्र

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केली. सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मोहिते यांना संघटनेने निवेदन दिले. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे, विजय शुगर फॅक्टरी, करकंब, या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासही निवेदन देण्यात आले. यंदा रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचा उत्पादन खर्च वाढल्याने दुस-या हप्त्याची मागणी केली आहे. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते दीपक भोसले, अजित बोरकर, सचिन पाटील, माने-देशमुख आदी उपस्थित होते. उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ यंदा शेतकऱ्यांनी ऊस तोडीची घाई न करता थोडे थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू हो

Natepute Pratinidhi
कुर्डुवाडीमध्ये एनडीआरएफचे थरारक मॉकड्रिल:रेल्वेच्या आपत्कालीन तत्परतेची घेतली चाचणी
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडीमध्ये एनडीआरएफचे थरारक मॉकड्रिल:रेल्वेच्या आपत्कालीन तत्परतेची घेतली चाचणी

तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे सिद्धाराम बाके तर उपसभापती म्हणून निंगाप्पा पुजारी यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड झाली. शिवसेना शिंदे गटाचे शिवानंद पाटील व उपसभापती पदासाठीचे उमेदवार इराणा धसाडे यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांनी काम पाहिले.या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Natepute Pratinidhi
पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट
सोलापूर जिल्हा

पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट

पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील 95 गावांमधून तब्बल 31 हजार 167 कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग्रामसभा घेऊन या संभाव्य लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्यात येत आहे. या ग्रामसभेत नागरिकांकडून हरकती व सूचनांची पडताळणी करुनच अंतिम यादी अपलोड केली जाणार आहे. तालुक्यातील विविध गावांमधून 18 हजार 51 नागरिकांनी स्वतः ऑनलाइन घरकुलांसाठी माहिती भरली असून, 13 हजार 116 कुटुंबांचे सर्वेक्षण ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पक्क्या घरासाठी शासनाकडून 1 लाख 20 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत स्वतः ऑनलाइन सर्वेक्षण करून माहिती नोंदवण्याची संधी वर्षभरापूर्वी देण्यात आली होती. दोन्ही सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण 31 हजार 167 नवीन संभाव्य लाभार्थींची यादी तयार झाली आहे.

Natepute Pratinidhi
नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
सोलापूर जिल्हा

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. 28 ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त 50 हजार पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर , अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ , राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे चार ते सहा हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी , गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती.

Natepute Pratinidhi
तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर
सोलापूर जिल्हा

तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर

पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास 50 वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ''''पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती''''च्या शिष्टमंडळाची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरला ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शवत पर्यायी विकास आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार समाधान अवताडे, राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी देशमुख, शेळके व इथापे यांच्यासह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Natepute Pratinidhi
अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात
महाराष्ट्र

अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय, ते काम ते उत्तम करतात

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेवरून केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. "अमित साटम यांना भुंकायलाच ठेवले असून, ते त्यांचे काम अगदी उत्तम पद्धतीने करत आहेत," असा घणाघाती पलटवार अमित ठाकरे यांनी केला. नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात मनविसेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माझा मुलगा कोणत्या शाळेत जाणार, हे साटम ठरवणार का? अमराठी रिक्षाचालकांच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, "स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीची केल्याचे सांगितले, तरी हे लोक हिंदीत भाषण करतात. यावरूनच यांना मराठी भाषेची किती काळजी आहे हे दिसून येते.

Natepute Pratinidhi
सुप्रिया सुळेंकडे ओबीसी दाखल्याचे वक्तव्य
सोलापूर जिल्हा

सुप्रिया सुळेंकडे ओबीसी दाखल्याचे वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या वादादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत नवा राजकीय वाद पेटला. "राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतली असून सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी दाखला आहे," असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. "महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मलाच का टार्गेट करत आहे?" असा थेट सवाल करत त्यांनी यावर तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केले होते. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी जाहीर खेद व्यक्त केला आहे. एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.

Natepute Pratinidhi
मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला
सोलापूर जिल्हा

मुरुमाच्या गाड्यांनी हंजगी-अक्कलकोट रस्ता खचला

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्या न सध्या सुरत-चेन्नई महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याची पुरती वाट लागली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अथक प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्क लकोट रस्त्याला न्याय मिळून त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अवघ्या एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, संपूर्ण रस्ता उखडल्याने पावसाळ्यात वाहनधारकांसह पायी जाणारे शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या अतिलोढ गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Natepute Pratinidhi
मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना
सोलापूर जिल्हा

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना

मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णसेवा, औषधसाठा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जन आरोग्य समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धतीची माहिती दिली. समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी, औषध कक्ष, औषधसाठा, रुग्ण तपासणी कक्ष, लसीकरण विभाग, प्रसूती कक्ष, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, साधनसामग्री आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

Natepute Pratinidhi
बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता
सोलापूर जिल्हा

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला 1994 मध्ये प्रथम मान्यता, 1915 मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व 2011 मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे 41 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सिंचन योजनांच्या कामाची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकारांना दिली. ^कोणी काय केले आणि कोणी काय केले नाही, यापेक्षा तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले हे जेन झी व अल्फा या तरुण पिढीला तसेच जुन्या पिढीतील विसरलेल्या लोकांना समजावे, यासाठी हा लेखाजोखा सादर केला आहे. दिलीप सोपल, आमदार, बार्शी 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून उजनी बोगदा आणि बार्शी सिंचन योजनेला मंजुरी मिळाली . त्यानंतर 1995 ला महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. 2011 मध्ये वाढीव कामास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली.

Natepute Pratinidhi
टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास - सुजात आंबेडकर
महाराष्ट्र

टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास - सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 'औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद' असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे व्यवसाय-दुकाने बंद पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुस्लिम तरुणांसमोर नोकरी आणि रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. सुजात आंबेडकर म्हणाले की, 2023 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती आणि अक्कलकोटच्या कार्यक्रमात टिपू सुलतानाचा फोटो स्टेजवर ठेवला होता. आता सर्व समाजाला एकत्र आणून राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे आपले काम आहे. साखर सम्राटांचे इथेनॉल धोरणावर मौन सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 पासून देशात महागाई प्रचंड वाढली आहे. ज्यांनी पूर्वी गॅस सिलेंडर हातात घेऊन आंदोलने केली, त्यांच्याच काळात आज सर्वसामान्यांना गॅस, साखर आणि अन्नधान्याचे भाव परवडेनासे झाले आहेत. 2014 नंतर कृषी उत्पादन घटल्याने

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा