Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी
सोलापूर जिल्हा

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी
सोलापूर जिल्हा

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी

गणेशोत्सवात डीजेला पूर्णतः बंदी घालण्याच्या घोषणेवरून अवघ्या 52 तासांतच पोलिस प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. रविवारी शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आक्रमकपणे डीजेमुक्त शहराची घोषणा केली होती. मात्र, डीजेचालकांनी घातलेला घेराव आणि राजकीय दबावापुढे झुकत 115 डीजेचालकांच्या बैठकीत थेट बंदीऐवजी आता 2 बेस आणि 2 टॉप स्पीकर्ससह साउंड सिस्टिमला परवानगी देण्याचा ‘सुवर्णमध्य’ पोलिसांकडून काढण्यात आला आहे. डेसिबल मोजून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांना दिला होता. दरम्यान, दोन बेस, दोन टॉपची मैदानावर चाचणी घेतली असून आवाज मर्यादेत राहतो. प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजून कारवाई होईल. डीजे स्पर्धांवर बंदी असून उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले. चौकात दोन डीजेंच्या स्पर्धेला पूर्णतः बंदी परजिल्ह्यातून शहरात मोठे डीजे आणून चौकाचौकात समोरासमोर आवाजाची स्पर्धा लावण्याच्या प्रकारावर पूर्णतः बंदी असेल.

Natepute Pratinidhi
मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित
सोलापूर जिल्हा

मुंबईतील इस्कॉनच्या ‘गोविंदा’सह तीन रेस्टॉरंट अन् राज्यात 19 परवाने निलंबित

जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह 3 प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई केली. यासह राज्यात इतर 19 आस्थापनांचे परवाने निलंबित केले. 4 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली.

Natepute Pratinidhi
दिवाळीला साखर स्वस्ताईसाठी प्रयत्न:कारखान्यांत 15 ऑक्टोबरपासून गाळप
सोलापूर जिल्हा

दिवाळीला साखर स्वस्ताईसाठी प्रयत्न:कारखान्यांत 15 ऑक्टोबरपासून गाळप

राज्यातील साखर उद्योग आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या 2026-27 च्या गाळप हंगामाची कोंडी अखेर फुटली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकार मंत्री समितीच्या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबर ऐवजी 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना सावरण्यासाठी सॉफ्ट लोन व्याज अनुदान, सहवीज निर्मितीला प्रति युनिट 1.50 रुपयांचे अनुदान आणि साखर पॅकिंगसाठी ज्यूट बॅगची सक्ती शिथिल करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘विशेष ऊस विकास योजना’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाळप हंगाम वेळेआधी सुरू केल्याने उत्पादित साखर काही प्रमाणात दिवाळीला बाजारपेठेत येईल.

Natepute Pratinidhi
संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन
सोलापूर जिल्हा

संभाजीनगरमध्ये पिझ्झा हटमध्ये व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन

‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत वाळूज एमआयडीसीतील प्रसिद्ध पिझ्झा हट (मे. सॅफायर फूड्स इंडिया लि.) आणि खुलताबादेतील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. कुचेकर यांनी नोटीस देऊनही त्रुटी न सुधारल्याने ही कारवाई झाली. या निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला असून अधिकाऱ्यांना पाळतीचे आदेश दिले आहेत. सोयाबीन तेलाचा खोटा दावा येथे व्हेज आणि नॉन-व्हेज अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. “सर्व पदार्थ व्हेजिटेबल सोयाबीन तेलात केले जात होते असे आढळून आले.

Natepute Pratinidhi
बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले
सोलापूर जिल्हा

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले

पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढरपूर तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने जाहिर केलेला नाही, त्यामुळे हफ्ता कधी मिळ णार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्यांकडून पोळ्याचा हप्ता तर दूरच, पण मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तंगी जाणवत आहे. पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बैल व इतर जनावरांना लागणाऱ्या साहित्याची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी उलाढाल होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन दिवसांवर सण आला तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद असल्याने शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही चिंतेत आहे

Natepute Pratinidhi
उपवर्गीकरण आंदोलन:उपवर्गीकरण आमचा हक्क, ते व्हावेच; स्पर्धा‎परीक्षांमध्येही गुणवत्ता सिद्ध करा- प्रा. ढोबळे‎
महाराष्ट्र

उपवर्गीकरण आंदोलन:उपवर्गीकरण आमचा हक्क, ते व्हावेच; स्पर्धा‎परीक्षांमध्येही गुणवत्ता सिद्ध करा- प्रा. ढोबळे‎

सोलापूर अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड उपवर्गीकरण मिळवणे हा आपला हक्क आहेच, मात्र मिळालेल्या सवलतींचा खरा लाभ घेण्यासाठी समाजाने शिक्षणाची आणि स्पर्धा परीक्षांची कास धरली पाहिजे. मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आणि उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. पण शिक्षण आणि ज्ञान असेल तरच मिळालेल्या न्याय्य आरक्षणाचा उपयोग होईल. जर आपण मुलांना शिकवले नाही, तर समाज पुन्हा शंभर वर्षे मागे फेकला जाईल. आरक्षण मिळाले तरी केवळ घोषणा देऊन भागत नाही. मातंग समाजातील मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि प्रशासनात स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी बुधवारी केले. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा नवीवेस पोलिस चौकी, लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिरमार्गे पुनम गेटवर आला.

Natepute Pratinidhi
एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎
सोलापूर जिल्हा

एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा,"नो डीजे नो डॉल्बी"या संकल्पनेचा प्रभावी वापर करा, तसेच एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या, सामाजिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका, रस्त्यावर स्टेज मारू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले . मोहोळ शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटीलयांच्या समवेत शांतता कमिटीची बैठक आयोजन मंगळवारी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले होते. या वेळी प्रस्ताविकात पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.शहरासह तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांनी महाराष्ट्रा समोर आदर्श निर्माण करावा. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे,गणेश मूर्ती जवळ सीसीटीव्ही कॅमेरे व स्वयंसेवक ठेवा, जेणे करून गणेशमूर्ती विटंबनेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलीस रेकॉर्ड लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. तुम्ही त्या यादीत येऊ नका.

Natepute Pratinidhi
कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग
सोलापूर जिल्हा

कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाबाबत ठराव मांडला जाणार होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. पंढरपूर नगरपालिका सर्वसाधारण सभेत विठ्ठल मंदिर परिसर संकुल विकास आराखड्यास भू-संपादनाचा विषय होता. या विषयास विरोध करण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. संत नामदेव महाराज समाधी पासून निघालेला हा मोर्चा चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेवर येऊन धडकला. या वेळी मोठ्या संख्येने महिला, युवक आणि बाधित कुटुंबातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी |पंढरपूर पंढरपूर नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने गाजली. विषयपत्रिकेत नसलेल्या गोशाळेच्या जागेवरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह वेठीस धरले, प्रचंड गदारोळ करीत सभात्याग केला. 15 मिनिटांनी पुन्हा सभागृहात येत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांसह एका सुरात पंढरपूर कॉरिडॉरचा विषय स्थगित ठेवला.

Natepute Pratinidhi
श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती
महाराष्ट्र

श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती

येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेला 139 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून या प्रशालेत तुम्ही शिक्षण घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळा व शिक्षक जीवनाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचा आपण सकारात्मक उपयोग करून घ्यावा, असे उदगार मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे यांनी काढले. येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य विद्यार्थी शिक्षक दिन उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे, एम. बी. मुन्नोळी, ए.एस.कोरे, एस. व्ही. गोडसे, आर. एम. इंगळे, जे. एस. बगले, ए. बी.शिंदे , मुख्याध्यापक मनस्वी कुलकर्णी, उपमुख्याध्यापक भागवंती देसाई, पर्यवेक्षक समीक्षा भांगरे, संस्कृती पगुडवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी क्रीडा शिक्षकाने शालेय प्रार्थना घेतली. इयत्ता सातवी व इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनींनी विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळा चालवली. यामध्ये सर्व शालेय कामकाजाची माहिती घेतली. उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी शिक्षक यांचा भेटवस्

Natepute Pratinidhi
शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ
सोलापूर जिल्हा

शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ

दुष्काळी परिस्थितीमध्ये हाताला काम द्या, कामाचा दाम द्या, धान्य द्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चावर पोलिसांनी 6 सप्टेंबर 1971 रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात 8 जण शहीद झाले. तर भाई सर्जेराव सगर व माजी आमदार नरसिंगराव देशमुख यांच्यासह 54 लोक जखमी झाले होते. 56 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेच्या स्मृती वैरागकरांनी आजही जपल्या आहेत. या हुतात्म्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वैराग तलाठी कार्यालयाच्या शेजारी एक स्मृतिस्तंभ उभा केला आहे. दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर एकत्र येतात व वैराग येथील खंडोबा वेसपासून मुख्य गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूक मोर्चा काढून स्तंभाला पुष्पचक्र वाहतात. ही परंपरा 56 वर्षांनंतर चालू आहे. या घटनेनंतर रोजगार हमी कायदा या घटनेनंतर राज्य शासनाने रोजगार हमी कायदा लागू केला. या गोळीबार प्रकरणानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा केला. आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही तो रोजगार हमी कायदा संपूर्ण देशात लागू करावा लागला. लोक सैरभैर धावत सुटले होते.

Natepute Pratinidhi
पानगावात आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र

पानगावात आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

बार्शी तालुक्यातील पानगाव येथे शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटना उपशाखा पानगाव यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद शाळेत उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच अंकुश मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुभेदार हरिश्चंद्र नवले, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, उपसरपंच रोहिणी जमदाडे, माजी सरपंच मनोज पाटील, दत्तात्रय काळे, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब कानगुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व पानगाव येथील भूमिपुत्र देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

Natepute Pratinidhi
मोडनिंबमध्ये फुलांची उधळण करत कृष्ण जन्माष्टमी सोहळा
सोलापूर जिल्हा

मोडनिंबमध्ये फुलांची उधळण करत कृष्ण जन्माष्टमी सोहळा

कृष्ण जन्माचा सोहळा झाल्यानंतर रात्री यमाई मंदिर परिसरात फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात भाविकांनी श्री कृष्णाचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी मसाला दूध वाटप करण्यात आले. मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाची शनिवारी दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. या सप्ताहाला सुमारे 150 वर्षांची अखंड परंपरा आहे. या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सप्ताहात विविध कीर्तनकारांची कीर्तने झाली. तसेच काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम नित्यने दररोज पार पडले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी आठ वाजता दिंडी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. जयदीप महाराज सावंत यांचे काल्याचे कीर्तन झाले.कै. अंबादास विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. सप्ताहानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली होती.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा