Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील
महाराष्ट्र

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील
महाराष्ट्र

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील

कुठे वंदे मातरम‌ तर कुठे टिपू सुलतान यांच्या फोटोबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. निवडणुका आल्या की असे मुद्दे उपस्थित करून निवडणुका जिंकायची हे भाजपचे सूत्र आहे. असे प्रश्न उचलण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईबद्दल भाजपने बोलावे, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. बुधवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगावमध्ये उपमहापौरांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे वाद उद‌्भवला होता. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता इम्तियाज जलील म्हणाले, ‘ज्या संविधानावर आपला भारत देश जिवंत आहे, चालत आहे त्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये डॉ. बाबासाहेबांनीच राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आहेत. ही मूळ प्रत लोकसभेत आहे. हिंमत असेल तर या संविधानातून यांचे फोटो काढून दाखवावे,’ असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. नांदेड, धुळे व सोलापूर मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळवण्यासाठी हायकोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला. राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा आहे भर राज्यात संघटनवाढीवर आमच्या पक्षाचा भर आहे.

Natepute Pratinidhi
जात पंचायतीकडून 20 लाख दंड; कुटुंबावरही बहिष्कार
सोलापूर जिल्हा

जात पंचायतीकडून 20 लाख दंड; कुटुंबावरही बहिष्कार

सुनेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात न घेतल्यावरून जात पंचायतीने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरेपर्यंत स्वतःसह कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याची तक्रार महुद बु. येथील बाळू रामा माने (52) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच मांत्रिकाकडून जादूटोणा करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी वामन कोंडीबा माने, सिताराम चिन्नाप्पा निंबाळकर, विजय नारायण निंबाळकर, बाळू भीमराव चव्हाण, दुर्गाप्पा भीमराव चव्हाण, सुखदेव शंकर निंबाळकर तसेच स्वप्निल आव्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत शारदा 2020 पासून आजारी शारदा ही 2020 पासून आजारी होती. तिच्या माहेरच्या व्यक्तींचा मांत्रिक स्वप्निल आव्हाडे याच्यावर विश्वास असल्याने शारदाला धार्मिक विधीसाठी त्यांच्याकडे नेले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये शारदाचा आजाराने मृत्यू झाला. शारदाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली असता, स्वतःची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तसेच मुलगा ऊसतोडीसाठी बाहेर गेल्याने आपण मृतदेह ताब्यात घेतला नाही, असे माने यांनी म्हटले.

Natepute Pratinidhi
वैरागच्या संतनाथ महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य सोहळा
सोलापूर जिल्हा

वैरागच्या संतनाथ महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य सोहळा

वैरागचे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांच्या नारळी पौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रावणमास यात्रा महोत्सवाचा मुख्य सोहळा आज ( गुरुवारी ) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. मुख्य दिवशी पहाटे सुमारे पाच वाजता धामणगावकर बोधले महाराज यांचा नाथपंथीय जोग कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर श्री संतनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे. मध्यरात्रीनंतरच अनेक नागरिक दंडवत घालत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत जाते. सकाळी गावातून शेरणीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दर्शनासाठी एक किलोमीटरची रांग लागेल, त्यानुसार व्यवस्था केली आहे. दुपारी सुमारे एक वाजता श्री संतनाथ महाराजांची पालखी मंदिरातून बाहेर पडणार आहे.

Natepute Pratinidhi
आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎
सोलापूर जिल्हा

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ 180.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा 66.9 टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 270.1 मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत 281.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री 96.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतात पिकांपेक्षा तणच अधिक वाढले असून, त्याचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचे चित्र आहे. पेरणीनंतर पाऊस न झाल्याने जळून गेलेल्या पिकांची स्वतंत्र नोंद मात्र अद्याप झालेली नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पिकांसाठी अपेक्षित 3 लाख 37,968 हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 26,871 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस वगळता एकूण पेरणीचे क्षेत्र 3 लाख 44,194 हेक्टरवर पोहोचले आहे.

Natepute Pratinidhi
डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव
महाराष्ट्र

डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव

ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक 2026 ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण 16 संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर 28 धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला.

Natepute Pratinidhi
पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत
महाराष्ट्र

पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत

नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिसंगी तलावात पाणी तातडीने सुरू करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नीरा उजवा कालवा विभाग मात्र या कोंडीत हतबल झाल्याचे दिसत आहे. नीरा उजवा कालव्यास 14 जुलैपासून वीर धरणातून सोडलेले पाणी सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी ते उंबरगाव, तिसंगी गावापर्यंतच्या लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना प्राधान्यक्रमाने पाणी सोडण्यात आले आहे. परंतु वरच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, कासेगाव, टाकळी, अनवली, बोहाळी, उंबरगाव, खर्डीसारख्या मोठ्या गावातील बड्या बागायतदार शेतकऱ्यांची शेततळी भरण्यापासून ते सांगोला आणि माळशिरस तालुक्यात पाणी वळवणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे 35 दिवस झाले तरीही बोहाळी हद्दीपर्यंत पाण्याचे आवर्तन आलेले नाही. याच दरम्यान पाच नंबरचे गेट काढून सांगोला तालुक्यात पाणी चालू झाले आहे.

Natepute Pratinidhi
अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎
महाराष्ट्र

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर, उपविजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली. रिलमेकिंग स्पर्धेत वैशाली वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी, मेंदी, पाककला, सौंदर्य प्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रिलमेकिंग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील व रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अकलूजसारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नाग पंचमीचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठ स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केला. तो पुढे डॉ. धवलसिंह यांनी सुरू ठेवला आहे.

Natepute Pratinidhi
वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही
सोलापूर जिल्हा

वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही

येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली श्री संतनाथ महाराज यांची यात्रा दि. 23 ते 28 ऑगस्टपर्यंत आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बुधवारी रात्री सात वाजता संपन्न झाली. यामध्ये यात्रेमधील नियोजनाविषयी चर्चा झाली. मात्र नर्तकींच्या ताफ्यांना परवानगी नाकारल्याने अनेकांचा हिरमूड झाला. यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिस ठाणे येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीमध्ये श्री संतनाथ महाराज देवस्थान समितीचे प्रमुख ,तसेच भंडारा कमिटी, यात्रेतील प्रमुख प्रतापराव निंबाळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पालखी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करणे , महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करणे ,यात्रा काळात स्वच्छ पाणीपुरवठा, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पथक नेमणे, दहिहंडी वेळेवर फुटावी यासाठी लेझीम संघ प्रमुखानी दक्षता घेणे, आदि विषयावर निर्णय घेण्यात आला.

Natepute Pratinidhi
करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा
सोलापूर जिल्हा

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा तालुका व शहरात मुलींसाठी अनेक खासगी शैक्षणिक क्लासेस सुरू आहेत. मध्यंतरी काही क्लासेसमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडले असून, काही ठिकाणी शिक्षकांकडूनच विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलींच्या सुरक्षेसाठी करमाळा तालुक्यातील सर्व खासगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्याचे आदेश संबंधित चालकांना देण्यात यावेत.

Natepute Pratinidhi
निमगावात महिलांनी धरला फुगडीचा फेर
सोलापूर जिल्हा

निमगावात महिलांनी धरला फुगडीचा फेर

माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गौराईचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांच्या पारंपरिक गाण्यांसह झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळांनी उत्सवाला रंगत आली. तर पुरुषांनी वावड्या व लेझीमच्या खेळातून उत्साहाचे दर्शन घडवले. गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूकीने गौराईचे विसर्जन करण्यात आले. निमगाव येथे गौराई उत्सवाची परंपरा जपली जात असून गावातील महिलांबरोबरच सासरी गेलेल्या माहेरवाशिणी मुलीही या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. गावातील बारा बलुतेदारांना चिखलाची गौराई बनविण्यापासून ते उत्सवाच्या सांगतेपर्यंतचा मान आहे. त्यानुसार गौराईच्या पटांगणात उभारलेल्या मंडपात मानकऱ्यांनी सकाळपासून चिखलाची गौराई साकारली. सायंकाळी पटांगणात महिला व मुली मोठ्या संख्येने जमल्या. पारंपरिक गाणी म्हणत झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळ खेळण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता गौराईची मिरवणूक सुरू झाली. गौराईला स्पर्श करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. गावालगतच्या ओढ्यात रात्री उशिरा गौराई व वावड्यांचे विसर्जन करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

Natepute Pratinidhi
जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस
महाराष्ट्र

जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस

सांगोला आपली उपजीविका ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा मेंढरांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने सांगोला शहरातील गावडे वस्ती येथे मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घरापुढे मंडप उभारला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वाढदिवसाचा बॅनरही लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा फोटो प्रसिद्ध केला. अन् एवढ्या व्यापातून आमदार डॉ. देशमुख यांनी हजेरी लावून मेंढरांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापला. घरातील सदस्याच्या वाढदिवसाप्रमाणे हा सोहळा रंगला होता. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्याची मागील सहा वर्षांपासून परंपरा आहे. येथील सिद्धेश्वर गावडे यांच्या पुढाकारातून त्यांच्या घराजवळ हा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या वेळी गावडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावडे कुटुंबीयांकडे सध्या सुमारे 90 मेंढरं असून, त्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही मेंढरांसाठी खास तीन मजली केक तयार करून आणला होता. आमदार देशमुख, नातेवाईक, मित्रमंडळी असे 300 हून अधिक नागरि

Natepute Pratinidhi
बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎
महाराष्ट्र

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (70, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (65, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह 32 जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. तर बसच्या पुढील भाग चक्काचूर झाला. पिंपळगाव आगाराची नाशिक -पाचोरा बस (एम.एच. 40 वाय 5822) चाळीसगावच्या दिशेने जात होती. यावेळी समोरुन मालेगावच्या दिशेने जाणारा आयशर (एम. एच. 19 सीवाय 8525) व बसची समोरासमोर धडक झाली. परिसरातील नागरिक व अन्य वाहन चालकांनी मदत करत बसमधील जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे घटनास्थळी अपघातातील मृत रखूबाई पिरन माळी ह्या नाशिक येथे मुलाकडे राहत होत्या. मुळगावी एरंडोल येथे रेशनिंगच्या कामासाठी येत असताना ही घटना घडली. तर इर्शादबी मणियार यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय होता. मालेगाव येथून येतांना हा अपघात झाला.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा