Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

LATEST STORIES

नवीन बातम्या

139 निकाल
श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज रसाळ (अंबड, जि. जालना) यांच्या वाणीतून भागवत कथा सप्ताह होणार आहे. दुसऱ्या सप्ताहात ह.भ.प. मनोहर महाराज घोरपडे (महालिंगरायवाडी, धाराशिव) यांचे गीता पठण होईल.

Natepute Pratinidhi
बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎
सोलापूर जिल्हा

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न' सभागृहाचे नाव बदलून“अटलबिहारी वाजपेयी सभागृह' करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास चर्चा झाली. साडीचा झोका बांधल्यामुळे हा अपघात झाल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करत शिवराज म्हेत्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रशासनाला जाब विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तो अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले.

Natepute Pratinidhi
पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार
सोलापूर जिल्हा

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार

"येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत... शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं 'वर्षा' निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता 'वर्षा'वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी जी पाण्याची टाकी ठेवली आहे, त्याच पाण्याच्या टाकीवर मी उपोषणाला बसणार आहे," असा थेट आणि आक्रमक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Natepute Pratinidhi
संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा
सोलापूर जिल्हा

संत सावता महाराजांच्या दारी श्रीफळ हंडी सोहळा

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला.सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितानी याची देहा याची डोळा पाहिला. श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी हजारो श्रीफळांची हंडी बांधलेली असते. गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, देहूकर कुटुंबीयांनी श्रीफळ हंडी फोडली.

Natepute Pratinidhi
नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना
सोलापूर जिल्हा

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 15 ते 17 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवेढा शहर व तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांनी केले आहे.

Natepute Pratinidhi
कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट
सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट

कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे 2 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारूनही, विरोध डावलून बांधकाम विभागाने ठेकेदाराला 99 लाख 4 हजार रुपयांचे बिल अदा केले. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ​राज्य शासनाच्या नगरपरिषद नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या पुलासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 1 कोटी 99 लाख 96 हजारांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अक्षय बागल या एजन्सीला देण्यात आले. ​नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेविका भाग्यश्री पाटील व नगरसेवक ऋषीपाल वाल्मीकी यांच्यासह इतर सदस्यांनी या कामातील गोंधळाबाबत मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला होता. काम व्यवस्थित तपासून मगच निर्णय घेण्याची मागणी केली असतानाही बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला 99,04,769 इतकी रक्कम अदा केली.

Natepute Pratinidhi
कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हा

कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

बार्शी कष्टकरी वर्गाला उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीने सोमवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, जगदाळे मामा हॉस्पिटल संघ, बांधकाम कामगार संघटना, बार्शी नगरपालिका संघटना व आरोग्य स्त्री परिचर संघटना उपस्थित होते. या वेळी कॉमेड ए. बी. कुलकर्णी, लहू आगलावे, लक्ष्मण घाडगे, आनंद गुरव, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Natepute Pratinidhi
डीपी-ईपीचा एकत्रित नकाशाच नाही; आरक्षण कुठे गेले
महाराष्ट्र

डीपी-ईपीचा एकत्रित नकाशाच नाही; आरक्षण कुठे गेले

शहर विकास आराखड्याचा (डीपी) अंतिम नकाशा नेमका कोणता, हा प्रश्न आता हजारो नागरिकांसमोर उभा राहिला आहे. 2 वर्षांच्या अभ्यासानंतर तयार झालेल्या विकास आराखड्यात शासनाने ‘ईपी’ (एक्सक्लुडेड प्लॅन) मंजूर करत तब्बल 408 प्रमुख बदल केले. मात्र, हे बदल मूळ ‘डीपी’मध्ये समाविष्ट करून समजेल असा एकत्रित अंतिम नकाशा अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे एखाद्या भागातील रस्ता, शाळा, रुग्णालय किंवा उद्यानाचे आरक्षण कायम आहे की बदलले, हे समजण्यासाठी नागरिकांना 2 वेगवेगळे नकाशे पडताळावे लागत आहेत. शासनाने विकास आराखड्याला मंजुरी देताना काही भाग वगळून ‘ईपी’ स्वतंत्र मंजूर केला. त्यात रस्त्यांची अलाइनमेंट, रस्त्यांची रुंदी, काही सार्वजनिक आरक्षणे आणि अन्य नियोजनात्मक बदल केले. या बदलांचे गॅझेट प्रसिद्ध झाले आणि आता नकाशेही उपलब्ध झाले आहेत. मात्र नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रश्न वेगळाच आहे.

Natepute Pratinidhi
7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक
महाराष्ट्र

7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक

व्यवसाय विस्तारासाठी 15 दिवसांत 7 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्सूल येथील प्रिंटिंग प्रेस उद्योजक प्रकाश रोहिणीकर यांना 1 कोटी 9 लाख 85 हजार 100 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी 11 ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्थानिक मध्यस्थ असलेल्या धर्मेंद्र झा (42) यास अटक करण्यात आली असून मोहिनी झा (35, रा. जयभवानीनगर), गणेश देशमुख (42), अमृता देशमुख ऊर्फ चिंचोळे (38, रा. जवाहर कॉलनी) तर दिल्लीतील सूत्रधार हरजितसिंग रुपराह (48), आरव अग्रवाल (40), अशोक सिंघल (35), दीपक आरोरा (30, चौघे रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या महिनाभरात कर्जाच्या नावाखाली फसवणुकीचा हा चौथा प्रकार आहे.

Natepute Pratinidhi
तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद
महाराष्ट्र

तू माझ्याकडे बघतोस यावरून वाद

बीड शहरालगतच्या इमामपूर रस्ता‎ परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ‎ जुन्या वादाच्या कारणावरून थरारक‎ गोळीबाराची घटना घडली. "तू‎आमच्याकडे काय बघतोस?'' असा ‎जाब विचारत झालेल्या‎ बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून ‎तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात ‎फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला‎ असून या प्रकरणी दोन आरोपींना ‎गजाआड केले आहे.‎ फिर्यादी शेख मोहम्मद साद (22, रा.‎जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी ‎तक्रार दिली. त्यावरून सफवान खान,‎सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर‎6 ते 7 अज्ञात आरोपींवर ग्रामीण ‎ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान,‎तु माझ्याकडे काय बघतोस या‎कारणावरून हा वाद झाला होता.‎ दोन जणांना बेड्या,‎कारही केली जप्त‎ तपास अधिकारी सहायक‎पोलिस निरीक्षक बाळराजे ‎दराडे यांनी घटना घडल्यानंतर‎ तातडीने तपासाची चक्रे‎ फिरवली.

Natepute Pratinidhi
सडलेल्या भाज्या अन् मुदतबाह्य पदार्थांचा साठा
महाराष्ट्र

सडलेल्या भाज्या अन् मुदतबाह्य पदार्थांचा साठा

हॉटेल अमरप्रीत (अवतार मोटेल्स आणि सिने प्रा. लि.) मध्ये बटरच्या नावाखाली आरोग्यास घातक असणाऱ्या मार्गारीनचा वापर करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने छाप्यात सडलेल्या भाज्या, मुदतबाह्य पिझ्झा बेस आणि मशरूमचा साठा जप्त केला आहे. या त्रुटींनंतर हॉटेल अमरप्रीतचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. हॉटेलमधील खाद्यसेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. ही कारवाई सहआयुक्त दयानंद पाटील, कीर्तिका झाडे, वर्षा रोडे, प्रज्ञा सुरसे आदींच्या पथकाने केली. बटर व्हर्सेस मार्गारीन : नफ्याचे गणित बटरचा दर 450 ते 550 रुपये प्रतिकिलो आहे, तर मार्गारीन 120 ते 180 रुपयांमध्ये मिळते. बटरऐवजी मार्गारीन वापरल्यास कच्च्या मालाचा खर्च 60 ते 70 टक्क्यांनी घटतो. यामुळे थेट नफ्यात बदल होतो. अस्सल बटर फ्रिजबाहेर राहिल्यास किंवा तापमान कमी-जास्त झाल्यास लगेच खराब होते आणि त्याला आंबट/खराब वास येतो.

Natepute Pratinidhi
14 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 दिवसांत त्रुटी दूर करा
महाराष्ट्र

14 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 2 दिवसांत त्रुटी दूर करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांकडून सादर झालेल्या 14 लाख शेतकऱ्यांच्या यादीत 43 त्रुटी आढळल्या. त्यामुळे शासनाने संबंधित बँकांना ‘शानिटी डाटा’ देऊन दोन दिवसांत चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. 13 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून 15 ऑगस्टनंतर सुधारित याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 लाख 22 हजार 27 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली होती. धाराशिव जिल्ह्यात 47 हजार 686 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील याद्यांच्या तपासणीत कर्जावरील व्याज आकारणीत तफावत आढळली.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा