'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे
देवेंद्र फडणवीस, विखे पाटील अन् सर्वांत मोठे एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवले हे सत्य आहे, जरांगे पाटील का फसत आहेत? त्यांनी फसू नये समजून घ्यावे, असे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते, हे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते असे त्यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शिवानंद भानुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलो आहे. मी त्यांच्या शिष्ट मंडळातही काम केले आहे. मुख्यमंत्र्यी आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा केली आहे. मराठा सेवा संघाने 1990 पासून लढा सुरू केला होता मराठ्याचे ओबीसीकरण त्याच पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू होते. परंतु वाशीमध्ये सगेसोयरे हा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता.